शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

संतमार्ग हा तेजाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:19 PM

जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,

ठळक मुद्दे म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असला पाहिजे.

संतांनी आम्हाला दाखविलेला प्रत्येक मार्ग हा तेजाचा मार्ग आहे आणि तो खूप सखोल व स्वच्छ आहे. या तेजस्वी मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात तेजच येते. या तेजाचा विचार करता त्यांनी आम्हाला,‘सहज बोलणे हित उपदेश।करुनि सायास शिकविती।।’या न्यायाने आमच्या जीवनातील कितीतरी समस्यांवरची उत्तरे दिलीत किंवा उपाय सुचविलेत.संतांनी असेच जे अनंत उपाय आम्हाला सांगितले आहेत. त्यातीलच ईश्वराच्या प्राप्तीचा एक खूप देखणा व आम्हाला सर्वांगाने अंतर्मुख करणारा उपाय सांगताना आमचे तुकाराम महाराज सांगतात,‘भावे गावे गीत।शुद्ध करोनिया चित्त।।तुज व्हावा आहे देव।तरी हा सुलभ उपाव।।’जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,‘भावबळे आकळे एरव्ही नाकळे।करतळी आवळे तैसा हरी।।’पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी बाकी कोणतं बळ आमच्या अंगी असो अथवा नसो, पण भावाचं बळमात्र आमच्या अंगी असायलाच हवं. एक भाविकसामर्थ्य आमच्या अंगी असेल, तर आम्हाला आमचं साधकीय जीवन अगदी सुदृढपणाने जगता येऊशकतं. म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असलापाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकkolhapurकोल्हापूर