शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भजन

By admin | Published: September 10, 2016 12:39 PM

जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही

डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा ‘‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ।।’’जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही. कारण ईश्वराने हा उत्कृष्ट असा मानव देह भजनासाठीच दिलेला आहे. ‘देवे दिला देह भजना गोमटा ।।’ मानवालादेवाने सर्वोकृष्ट अशी वाणी दिलेली आहे. मानवाची वाणी विचार प्रधान तर आहेच त्याबरोबर या वाणीने भावही प्रगट करता येतो. भगवंताला जोडण्याचे सहज साधन हे वाणीच आहे. ‘‘पवित्र तो देह वाणी पुष्यवंत । जो वदे अच्च्युत सर्वकाळ ।।’’ ‘‘भावे गावे गीत । शुध्द करुनिया चित्त ।। तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ।।’’ ईवरप्राप्तीचे सुलभ साधन असेल तर ते भजनच आहे. वारकरी संप्रदायाचे सर्वच वाड्मय गेय स्वरुपात निर्माण केलेले आहे. गायनामध्ये मनुष्य सहज रंगला जातो, रममाण होतो आणि त्याचे चित्त भगवंताशी एकाग्र होते. म्हणूनच सर्व संतांच्या रचना काव्य स्वरुपात आहेत आणि त्या गेय आहेत. संत तुकोबाराय म्हणतात ‘‘ गायनाचे रंगी । शक्ति अभ्दूत हे अंगी ।।’’ गायनामध्ये अभ्द्त शक्ती आहे याचाच अर्थ गायनाद्वारे सहज भगभ्दाव प्रकट होतो तसेच गेय वाड्मय पाठांतरासाठी सुलभ बनते. संत वाड्मय हे मंत्रग्रंथ आहेत, म्हणून त्याचे पारायण व पाठांतर आवश्यक आहे. काव्याचे पारायणही सोपे जाते आणि या भजनाद्वारे हरिनाम साधना घडते. कुठल्याही ग्रंथाचे पारायण करणे किंवा साग्रसंगीत भजन करणे हे नामचिंतनच आहे. कारण सर्व ग्रंथ अंतिमरित्या आपणास त्या परमेश्वराच्या नामालाच जोडू इच्छितात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘‘देखैं मनुष्य जात सकळ । हे स्वभावता भजनशील । पार्था जालेचि असे केवळ । माझा ठाई ।।’’ यामध्ये मानवाला त्याच्या मूळ स्वभावाची आठवण करुन दिली आहे आणि सूचित केले आहे की, मानवी जीवनाची मांडणी भगवभ्दजनावरच आहे.