शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आनंद तरंग : पाचवी कला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:25 IST

परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते,

विजयराज बोधनकरनियोजनाने मोठमोठे चमत्कार घडले आहेत. नियोजनामुळे अनेक सामान्य माणसे आकाशाइतकी मोठी झाली आहेत. गोष्ट कुठलीही असो पक्के नियोजन असेल तर उत्तम यश पदरी पडते. मग नियोजन म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. नियोजनासाठी पूर्णपणे बुद्धीचा वापर करावा लागतो, बारीकसारीक गोष्टींचा विचार करूनच मांडणी करावी लागते. घरात लग्न असो, नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असो, दूर कुठे तरी प्रवासाला जायचे असो, गावात उत्सव असो, सरकारी योजना असो, शैक्षणिक योजना असो, असे अनेक विषय असो, यात नेमके धोके कुठे आहेत, नेमकी कुठली बाजू महत्त्वाची आहे, याला येणारा खर्च किती, मनुष्यबळाची काय तयारी करावी लागणार, नियमांची उजळणी किती करावी लागणार, आर्थिक पाठबळ कसे उभे करता येईल, दिनक्रमात वेळेचा सदुपयोग कसा करून घेता येईल, अशा अनेक गोष्टींचे चिंतन मनन करून त्याची डायरीत नोंद करून त्यावर अंमलबजावणी करणे म्हणजे नियोजन होय.

परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते, ही एक मोठी कला आहे. मोठमोठी मॅनेजमेंटची कॉलेजे याचे शिक्षण देतात, व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियोजनाची कला खूप यश पदरात पाडून जाते, घरापासून ते देशाच्या कारभारापर्यंत नियोजनासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे, दिवसभराचे, आठवड्याचे, महिनाभराचे आणि वर्षभराचे नियोजन करणारी व्यक्ती कधीही सैरभर न होता ठरविल्या मार्गाने आपल्या स्वप्नांचा प्रवास करीत राहते आणि अपयशापासून स्वत:ला वाचवत असते. आध्यात्मिक मार्ग आणि नियोजनाचा मार्ग एकचआहे. ज्यामुळे बुद्धी स्थिर राहते आणि मन सकारात्मक विचार करण्यास सतत प्रवृत्त होत राहते. म्हणूनच नियोजनाला पाचवी कला आणि महत्त्वाची कला समजावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक