शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

आनंद तरंग - होकाराचे बीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 3:54 AM

सुप्तशक्तीची ताकद ठिणगीतून लागलेल्या आगीसारखी असते.

विजयराज बोधनकरसुप्तशक्तीची ताकद ठिणगीतून लागलेल्या आगीसारखी असते. फक्त ती ‘हो’ म्हणण्याची सुप्त अग्नी आहे की ‘नाही’ म्हणण्याचा सुप्त अंधार आहे यावर ते अवलंबून आहे. नकाराचा अंधार सर्व आयुष्य भस्मसात करून टाकते तर होकाराचा यज्ञ दिव्य दृष्टी प्रदान करून जाते. सकारात्मक विचार करण्याची एक कला आहे. ही कला एक अंगभूत कला असते. जी अभ्यास करून शिकविली जात नाही, प्रत्येक माणसाची विचारतरंगशक्ती भिन्न असू शकते. म्हणून तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. मग विचार करणे म्हणजे काय हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी नेमके एक उदाहरण म्हणून घेतले तर जसे, दहावीनंतर विद्यार्थी अवस्थेत आपण काय शिकले पाहिजे याचा विचार स्वत:च करणे योग्य मार्ग दाखवू शकते. याउलट ज्याला त्याला विचारून मग अभ्यासाची दिशा ठरविणे घातक ठरू शकते. म्हणजेच स्वत:ला विचारक्षमता वाढविण्याची इच्छाच नाही ही नकाराची भावना माणसाचे आयुष्य डळमळीत बनवू शकते.

ज्या व्यक्तीजवळ विचार ऊर्जाच नाही अशा व्यक्तीला करिअरसाठी कुणीही मदत करू शकत नाही. कारण आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा, स्वत:ची विचारक्षमता नसलेल्या व्यक्तीच्या वाटा सतत चुकत जाऊन शेवटी पदरी दु:ख पडत राहते. म्हणून सतत विविध स्तरांवरचे वाचन करणे गरजेचे असते. मग पुस्तके किवा अनेक घडलेल्या घटना जरी डोळसपणे वाचल्या तरी विचारक्षमता ही उत्तर प्रक्रियेला हातभार लावत असते. जो युवक सतत उत्तम काही ना काही वाचत असतो, निरीक्षण करीत असतो, त्याच्या विचारांचा पिंड तयार होत जातो. या वाचनक्षमतेतून विचार सामर्थ्य वाढत जात राहते. ज्यांनी ज्यांनी आयुष्यात सकारात्मक मुसंडी मारली त्यामागे केवळ अनुभवाची विचारऊर्जाच असते. ही विचारऊर्जा एखाद्या उंच उडणाऱ्या पक्ष्यासारखी असते जी गगनाला गवसणी घालू शकते.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक