शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

अध्यात्मिक - स्वर्ग आणि नरक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 3:58 AM

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत.

जेव्हा माणूस मरतो, तो आपले शरीर टाकतो आणि सोबत आपली सदसद्विवेकबुद्धीसुद्धा. पण मनाच्या स्मृतींचा हिस्सा मात्र तसाच कार्यरत राहतो आणि या शाबूत स्मृती मनोवृत्ती म्हणून कार्यरत असतात. या स्थितीत मृत व्यक्तीला निवड करणे शक्य नाही. कारण त्याने आपली सदसद्विवेकबुद्धी गमावली आहे. असे निवड स्वातंत्र्य नसल्यामुळे, जर त्याचा स्मृतिकोश दु:ख आणि क्लेशांनी भरलेला असेल, तर हे दु:ख लाखो पटींनी वाढू शकते. उदाहरणार्थ, या क्षणी जर तुम्ही रागावलात, तर तुम्ही तुमची सदसद्विवेकबुद्धी वापरून राग नियंत्रणात ठेवू शकता. पण जर ही सदसद्विवेकबुद्धी तुमच्याजवळ नसती तर हा राग उफाळून उद्वेग बनला असता. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्या क्षणापर्यंत जे काही त्यांच्या मनात साठलेलं असो, मृत्यूची ती शेवटची घटका अत्यंत महत्त्वाची असते. कारण जर आयुष्यभर त्यांची मनोदशा सामान्यत: आनंदी असेल तर मृत्यूपश्चात तीच स्थिती अनेक पटीने वाढते. आणि मनोदशा सामान्यत: क्लेशदायक स्थितीत असेल तर तेसुद्धा कित्येक पटीने वाढू शकते. एक व्यक्ती अत्यंत क्लेशकारक दशेत असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती नरकात गेली आहे. जर ती अत्यंत आनंदावस्थेत पोहोचली असेल तर आपण म्हणतो ती स्वर्गात गेली आहे.

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत. या अनुभवाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, विशेषकरून मृत्यूनंतर. योग परंपरेत एक सुंदर कथा आहे. एक चौऱ्यांशी वर्षांचा योगी होता आणि सर्वांना तो सांगत सुटला, ‘तुम्हाला माहीत आहे मी मरणार आहे आणि लवकरच मी स्वर्गात जाणार.’ इतर योग्यांनी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कसं माहीत, तुम्ही स्वर्गात जाणार? देवाच्या मनात काय चाललंय, तुम्हाला माहीत आहे का?’ योगी म्हणाला, ‘देवाच्या मनात काय चाललंय त्याच्याशी मला काय करायचंय. माझ्या मनात मात्र काय चाललंय मला माहीत आहे.’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक