शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

अध्यात्मिक : मोले घातले रडाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 3:00 AM

मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस

मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच; परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर, कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून अशा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर जर एखाद्या सहृदयीच्या वतीने दोन-चार लोकांना पाच-पन्नास रुपये दिले तर ते गेलेल्या व्यक्तीविषयी किती रडणार? ज्या व्यक्तीविषयी ज्यांच्या मनात माया व संवेदना नाही, त्या व्यक्तीसाठी भाडोत्री रडणारे त्याच्या गुणकर्माला आठवून रडत नाहीत तर केवळ पाच-पन्नास रुपयांच्या मजुरीपुरते रडतात. ज्याचा संबंध आंतरिक भाव-भक्तीचा प्रेममय जिव्हाळा व कोरडा भाडोत्रीपणा यांच्याशी जोडताना संत तुकोबाराय म्हणतात,

मोले घातले रडाया, नाही आसू अन् मायातैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय।वेठी धरल्या दावी भाव, मागे पळावयाचा पाव ।काजव्याच्या ज्योती, तुका म्हणे न जगे वाती ।

भक्तीच्या क्षेत्रात धूप, दीप, नैवेद्याचा सुकाळ दीपांची आरास व राजस सोहळ्याची बेगडी प्रवृत्ती असली तर त्या भक्ताची अवस्था मोलाने रडणाऱ्या संवेदनहीन माणसासारखी होते. तो हसतोही खोटे आणि बोलतोही खोटे. पण या खोट्यांच्या कपाळी गोटा मारण्याऐवजी त्यांच्याच भोवती अज्ञानी भक्तांची भाऊगर्दी होते. कधी नामगर्जनेच्या रूपाने, कधी प्रेमानंदाच्या उन्मादाने आज अनेक नवे कृष्णावतार आणि राधेमाँ निर्माण होत आहेत. अंतरंगात भावभक्तीचा फुलोरा फुलला पाहिजे तरच सत्य, ज्ञानानंद ईश्वरी ज्ञानाचा दिवा मन नावाच्या मंदिरात पेटतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक