शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

संघभावना ही यशाची गुरुकिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 23:08 IST

विवेकानंद म्हणाले, ""जिच्या प्रेमात मी पडतो ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, ती संघटना होय...

- डॉ.दत्ता कोहिनकरएका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. त्याला विचारले, ""काय भाव आहे द्राक्षांचा...? तो म्हणाला, ""साठ रु. किलो जवळच, सुटी द्राक्षे ठेवली होती. त्याला म्हणालो, ""यांचा काय भाव आहे? तो म्हणाला, ""पंचवीस रुपये किलो पुन्हा विचारले, ""यांचा भाव साठ रुपये व यांचा भाव 25 रुपये असे का?तो म्हणाला, ""साहेब दोन्ही द्राक्षे एकाच बागेतली आहेत. दोन्ही गोड व चांगलीच आहेत; पण ही घडात - एकसंघ असल्याने साठ रुपये व ही घडातून तुटून एकेक झाल्याने 25 रुपये. मी समजून गेलो. *जोपर्यंत आपण एकसंघ आहोत, तोपर्यंत आपली किंमत उच्चतम असते. ज्या क्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो, तेव्हा आपली किंमत खूप खाली येते* म्हणून कुटुंबात - नातेवाइकांत, संघात राहण्यासाठी आपली धडपड चालू असते. एकटा माणूस फार मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाचीच गरज असते. अमेरिकेत विवेकानंद आपल्या भाषणात म्हणाले, ""आज मी एकीच्या प्रेमात पडलोय. सगळी सभा अवाक झाली, विचार करू लागली अशी कोण, नशीबवान युवती आहे जिच्या प्रेमात हा राजबिंडा योगी पडला आहे? विवेकानंद म्हणाले, ""जिच्या प्रेमात मी पडतो ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, ती संघटना होय, टीम होय. विवेकानंदांनीदेखील संघभावनेचे महत्त्व पटवून दिले होते. भगवान बुद्धदेखील म्हणतात "संघम्‌ शरणम्‌ गच्छामि!पानिपतच्या युद्धात अहमदशाह अब्दाली रणनीतीची आखणी करत असताना नदीच्या पलीकडच्या काठावरील मराठ्यांच्या छावणीची पाहणी करत होता. त्या वेळी मराठ्यांच्या छावणीत जागोजागी चुली पेटलेल्या त्याला दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्याने गुप्तहेराकडे केली, तेव्हा त्याने सांगितले, ""मराठ्यांचं सैन्य फारसं नाही. तेथील प्रत्येक सैनिकाने आपल्या स्वयंपाकासाठी स्वतंत्र चूल पेटवली आहे.ह्यह्य त्यावर चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, ""आपण शंभर टक्के युद्ध जिंकणार. कारण जे सैनिक अन्न शिजवतानाही एकत्र येत नाहीत, ते राष्ट्रासाठी एकदिलाने कसे लढतील? पानिपतचा, इतिहास आपणास माहीतच आहे म्हणून संघाने एकत्र येणे ही आवश्‍यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळ्या विचारांचे असतात. म्हणतात ना, "व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कैशल्य असते. भगवान बुद्ध म्हणतात, "एकमेकांना समजून घेणारा, एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा, एकमेकांचे हित चितणारा, एकमेकांची प्रगती करणारा, एकमेकांचा आदर करणारा असा संघ नेहमी पुढे जातो.म्हणून संघभावना टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे म्हणजे बेडकांचे तराजूत वजन करण्यासारखे आहे. एक तराजूत टाकताना दुसरा झटकन उडी मारून बाहेर पडतो म्हणून संघ तयार करून सर्वांनी एकविचारांनी एकत्र राहणे आवश्‍यक असते. यासाठी नेता हा देखील निःस्वार्थ व लोकप्रिय असावा लागतो. नेपोलियनचे सैनिक त्याने दिलेला आदेश तंतोतंत पाळायचे. त्यावर कोणीही प्रतिप्रश्‍न करीत नसत किंवा शंका घेत नसत. नेपोलियनचे यश यातच दडलेले होते. एकता व आज्ञाधारकता एकत्र आली आणि संघभावना वाढीस लागली, की यशाची दारे उघडणे सोपे जाते.

 

टॅग्स :PuneपुणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदAdhyatmikआध्यात्मिक