शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विवाह साेहळ्यात दीडशे वऱ्हाडींना विषबाधा; निमगाव येथील घटना

By सुदाम देशमुख | Updated: November 5, 2023 22:55 IST

वेगवेगळ्या रुग्णालयात केले दाखल

शिर्डी (जि. अहमदनगर): येथून जवळच असलेल्या निमगाव येथे रविवारी झालेल्या एका विवाह सोहळ्यात जवळपास दीडशे वऱ्हाडींना अन्नातून विषबाधा झाली. दुपारी जेवल्यानंतर सात ते आठ तासांनी त्यांना त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री त्यांना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शिर्डी येथील रहिवाशी असलेल्या त्रिभुवन कुटुंबियातील मुलीचा विवाह हा पुणेस्थित आल्हाट कुटुंबियांतील मुलाशी झाला. रविवारी दुपारी वैदिक पद्धतीने फक्त कुटुंबिय व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला. यात नातेवाईकांनी जेवण केले. त्यानंतर काहीवेळात त्यातील तीन ते चार जणांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. ज्यांना त्रास झाला, त्यांनी सीताफळ रबडी खाल्ली होती, असे नातेवाईकांनी सांगितले. त्रास जाणवल्यानंतर वऱ्हाडींना उपचारासाठी साई संस्थांनच्या दोन्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात साईबाबा रुग्णालयात जवळपास ३५ तर साईनाथ रुग्णालयात अंदाजे शंभरहून अधिक व्यक्तींना दाखल करण्यात आले असल्याचे रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले.

रात्री वाढली रुग्णांची संख्याविवाह सोहळ्यातील एक जण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्ण सामान्य विभागात आहेत. काहीजणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झाल्याने विवाह सोहळ्यात एकच धावपळ उडाली असून रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली. दुपारी तीनच जणांना त्रास झाला. संध्याकाळी सात वाजल्यानंतर आणखी आठ ते दहा जणांना, रात्री नऊ वाजता ही संख्या भंरपर्यंत गेली. मुहुर्तावरील विवाह सोहळा रात्री झाला. त्यानंतर त्रास झालेल्यांची संख्या वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एकच पळापळ झाली. रात्री साडेदहा वाजेपर्यंत वऱ्हाडींना रुग्णालयात नेण्याची धावपळ सुरू होती.