शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
5
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
6
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
7
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
8
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
9
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
10
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
11
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
14
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
15
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
17
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
18
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
19
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
20
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही

'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 4:56 PM

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी केली. एका अडत व्यापाऱ्यानं कांदा शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिला म्हणून यांनी त्याचा परवाना निलंबित केला. तू दोन रुपयाचा धनादेश दिला आणि आमची बदनामी झाली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं. प्रत्येक आमदाराला आज सांगितलं जात आहे की तुला मंत्री करणार, पण मंत्रिमंडळ विस्तार काही अद्याप केला गेलेला नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. 

"एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. मुंबईत तर १७ कोटी रुपये जाहिरासाठी खर्च केले गेले. सगळीकडं यांच्याच जाहिराती आणि यांचेच फोटो. एक डबळी एसटी दिसली त्याखालीही या दोघांचेच फोटो. असे फोटो शोभतात तरी का?", असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. 

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना आता अवकाळी पावसानं कापूर, हरभऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले होते त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेनं मनात आणलं तर हेही सरकार पडू शकतं, असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार