शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रचाराचा नारळ फुटला, उमेदवारांचा प्रचार फेऱ्या, रात्रं दिवस बैठकांवर भर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:22 IST

विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे.

Ahilyanagar Election ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे बारा दिवस उरले आहेत. घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे आता शक्य नाही. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला आहे. दिवसभर प्रचार फेऱ्या आणि रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे. उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. 

प्रचाराच्या साहित्यापासून ते कार्यकर्ते जमविण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. प्रचाराचे नियोजन करून उमेदवार भल्या सकाळीच घराबाहेर पडतात. दुपारी बारा वाजेपर्यंत प्रचार फेऱ्या सुरू असतात. प्रचार फेरीत संवाद यात्रा, विकास यात्रा, परिवर्तन यात्रा, यासारखे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे, तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो दिसतात. उमेदवार एका पक्षाचा असला तरी त्यांना इतर चार ते पाच घटक पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे उमेदवारांच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे पंचे असतात. मित्रपक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे पंचे घालून प्रचारात सहभागी होतात. शहरी भागात सकाळी व संध्याकाळी, अशा दोन टप्प्यात प्रचार फेऱ्या निघतात.

रात्री उशिरापर्यंत प्रचार फेऱ्या सुरू राहतात. उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत होते. महिलांकडून औक्षण करण्यात येते. वेळेअभावी उमेदवारांच्या प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही. परंतु, कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने उमेदवारांचाही नाईलाज होतो. त्यात बराच वेळ जातो. परिणामी, दिवसभराचे नियोजन कोलमडते. सकाळी सुरू झालेली प्रचारफेरी दुपारपर्यंत सुरू असते. घरातील प्रमुख व्यक्ती कामानिमित्त सकाळीच बाहेर पडतात. त्यामुळे मतदारांची भेट होत नाही. परिणामी, प्रचार फेऱ्या थांबविण्याची वेळ उमेदवारांवर येते. फेऱ्यांबरोबरच इतरही नियोजन करावे लागते. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठका शक्यतो रात्री होतात.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Ahilyanagarअहिल्यानगरVotingमतदान