शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
2
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
3
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
4
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
5
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
6
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
7
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
9
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
10
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
11
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
12
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
13
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
14
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
15
याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
16
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
17
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
18
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
19
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
20
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

अहमदनगरसह महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू - पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:47 PM

अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगरसह १३ जिल्ह्यात जलस्तर अत्यंत कमी होता. अशा जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगरसह १३ जिल्ह्यात जलस्तर अत्यंत कमी होता. अशा जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून व्हॅर्च्युअल प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू आहे. गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी मिळणार आहे. हे काम महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात १९ लाख परिवाराला शुद्ध पाण्याची सुविधा मिळाली आहे. यामध्ये १३ लाख परिवाराला कोरोनाच्या काळातही पाणी पोहोचवले आहे, असे मोदी म्हणाले.

घर घर शौचालय, तसेच ‘नळ से जल’ पोहोचवून नागरिकांचा वेळही वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मायक्रो फायनान्सद्वारे सेल्फ हेल्प या स्वरुपात महिलांना कर्ज वाटप केले आहे. किसान क्रेडीट कार्डाचीही शेतकरी परिवाराला सुविधा दिली आहे. 

इथेनॉलचा प्रकल्पाचे महाराष्ट्रात शंभराहुन अधिक उद्योग सुरू  आहेत. तेलाचा पैसा जो बाहेर जात होता तो आता शेतकºयांच्या खिशात येईल. यामुळे साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले. पाण्याच्या प्रश्नावर स्व. विखे यांनी जनआंदोलन केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची ओळखच पाण्याच्या कामासाठी आहे.

घराघरात त्यांनी पाणी पोहोचवले. २६ योजनांद्वारा पाणी पोहचविले आहेत. यातील ९ योजना पूर्ण झाल्या आहेत. पाच लाख हेक्टर जमिनीला सिंचन मिळाले आहे. जुलै २०१८ मध्ये ९० सिंचन प्रकल्पांचे काम सुरू झाले होते. दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNarendra Modiनरेंद्र मोदी