शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

पाणवठ्यामुळे परतले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 3:54 PM

नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते.

केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते. पाण्याच्या शोधात हे जीव अन्यत्र स्थलांतरीत झाल्याचे लक्षात येताच गावातील पांडुरंग प्रतिष्ठानच्या तरुणांनी वन्यजीवांचे अस्तित्व असणाऱ्या भागात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आणि काही दिवसांच्या अवधीनंतर गावातून निघून गेलेले वन्यजीव गावाकडे पुन्हा फिरले.नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावातील परिसरात चौत्रा नावाचा एक दुर्गम भाग आहे. या भागात हरीण, ससे, लांडगे, कोल्हे, मोर व इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे अस्तित्व आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजलेला असतो. मात्र भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील वन्यजीवांचे अन्न पाण्यावाचून हाल सुरु झाले. पाण्याच्या शोधात यातील अनेक वन्यप्राणी हा परिसर सोडून इतरत्र स्थलांतरीत होऊ लागले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणारा हा परिसर प्राणी व पक्ष्यांअभावी ओसाड बनला. गावातील पांडुरंग प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी वन्यजीवांसाठी काहीतरी करण्याची तयारी सुरु केली.ज्या पाण्याअभावी वन्यजीव निघून गेले त्याच पाण्याच्या सोयीसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी पाणवठे तयार केल्यानंतर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निघून गेलेले सर्व वन्यजीव या परिसरात परतू लागले. ओसाड बनलेला हा परिसर पुन्हा गजबजून गेला. गावातील अनेक तरुण यासाठी सहकार्य करीत आहेत. पाणवठे तयार करण्यासाठी शाम घोलप, राजेंद्र काळे, किरण शिंदे, आकाश ओव्होलकर, विशाल घोलप, अभिमान घोलप यांनी परिश्रम घेतले.पाणवठे तयार केल्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात एकही पक्षी नजरेस पडला नाही. यामुळे केलेले परिश्रम वाया जातात काय अशी भीती वाटू लागली. मात्र काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजारो पशु-पक्षी या परिसरात पुन्हा परतले आणि हा परिसर पुन्हा गजबजला. - शाम घोलप ( सचिव, पांडुरंग प्रतिष्ठान, भातोडी)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर