शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेलापूर-पढेगाव रेल्वे चाचणी यशस्वी, दुहेरीकरण वेगाने; नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

By शिवाजी पवार | Updated: July 23, 2023 19:48 IST

लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामातील बेलापूर ते पढेगाव या १३ किलोमीटर अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.

      गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. शनिवारी ही दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली. एकूण ९४ किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती रेल्वेचे उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.        एकेरी मार्गामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी ठेवावा लागत होता. अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा दिला जात होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून राहत होती. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजीनचा वापर करून दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे. या कामामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति किमी वेगाने धावणार आहे.    रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, अभियंता धर्मेंद्र कुमार, आर. डी. सिंग, सुद्धांशू कुमार, प्रगती पटेल आदी उपस्थित होते.