शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 3:52 PM

अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन  सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.

 

अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन  सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.कालवा सल्लागार समितीच्या नियोजना प्रमाणे सोमवारी दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात 1 हजार 500 कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.भंडारदरा धरणातून या पूर्वीच निळवंडे धरणात पाणी सोडण्यात येत होते.भंडारदऱ्यातून वीज निर्मितीसाठी 830 कुसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.सोडण्यात येणारे हे पाणी निळवंडे धरणात येत असते. शेतीसाठी सोडण्यात येणारे हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असून या कालावधीत सुमारे 3 हजार ते 3 हजार 400 दशलक्ष घनफुट पाण्याचा वापर होईल असा अंदाज भंडारदराचे शाखा अभियंता देशमुख यांनी व्यक्त केला. पाणी सोडते वेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा 6 हजार 575 दशलक्ष घनफुट इतका होता तर निळवंडेतील पाणीसाठा 4 हजार 374 दशलक्ष घनफुट होता.