शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नगर विधानसभेची जागा भाजपलाच घेणार-दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:45 IST

नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असे माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले.

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या विकासाला ३०० कोटी देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे नगर शहरात मुख्यमंत्र्यांचे शाही स्वागत करण्याचे नियोजन माजी खासदार दिलीप गांधी यांनी केले आहे. नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असेही गांधी म्हणाले.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात येत आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजता शहरातून रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गांधी चांगलेच आक्रमक झाले होते. भाजपकडून सात ते आठजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा फैसला वरिष्ठ घेतील,मात्र आधी ही जागा भाजपलाच घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. जागा तर भाजपलाच मिळणार आहे, यात शंका नाही. मात्र युती म्हणून अनिल राठोड यांना उमेदवारी देणार असाल तर त्याला पहिला आमचा विरोध राहील. राठोड यांना गांधी चालत नसेल तर गांधी यांनाही राठोड अजिबात चालणार नाही. गेल्या २५ वर्षांत कोणताही विकास कामे झाली नाहीत. शहरात उद्योग आले नाहीत. रोजगार मिळाला नाही. त्यामुळे शहरात आता बदल हवा आहे. बदल घडविण्यासाठी नगर विधानसभाचे जागा भाजपलाच मिळणे गरजेचे आहे. असेही गांधी यांनी सांगितले.दरम्यान महाजनादेश यात्रेचे शाही स्वागत करण्यात येणार आहे. हत्ती, घोडे, तुतारी, सनई, चौघडा, कमानी, पुष्पवृष्टी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार असून त्यादृष्टीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

टॅग्स :Dilip Gandhiखा. दिलीप गांधीBJPभाजपा