शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

‘सर्कस’ आहे, पण आमच्याकडे ‘जोकर’ नाहीत-हसन मुश्रिफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 2:19 PM

आमचे सरकार तीन पक्षांचे असल्याने तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्कस असली तरी त्यामध्ये जोकर नाहीत, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप नेत्यांना लगावला. 

अहमदनगर : आमचे सरकार तीन पक्षांचे असल्याने तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्कस असली तरी त्यामध्ये जोकर नाहीत, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप नेत्यांना लगावला. 

      कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्राचे सरकार हे सरकार की सर्कस? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुश्रिफ म्हणाले, सरकारमध्ये समन्वय असून कोरोना रोखण्यासाठी सरकारला यश आलेले आहे. नगर जिल्हा एक जूनला कोरोनामुक्त होईल, असे आपण म्हणालो होतो, मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. प्रशासन चांगले काम करीत आहे, मात्र या कामाला दृष्ट लागली आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली.  जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. याबाबत आता मुहूर्त काही देणार नाही, असे मुश्रिफ यांनी स्पष्ट केले. 

      पीक कर्जाबाबत जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना आदेश दिले असून आता शेतक-यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही, याबाबत आदेश दिले आहेत. कोविड-१९मुळे  सरकारही आर्थिक संकटात होते, त्यामुळे कर्जमाफीचे पैसे बँकांकडे आले नाहीत.  मात्र शेतक-यांची आधीची कर्जाची रक्कम सरकारच्या नावे दाखवा, मात्र खरिप पिकांसाठी शेतकºयांना कर्ज देण्यासाठी अडवू नका, असेही बँकांना बजावण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. गतवर्षीच्या पावसाच्या स्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन न झाल्याने यावर्षी बियाणांची टंचाई आहे. मात्र शेतक-यांनी घरातले सोयाबीन वापरून टंचाईवर मात करावी. खते आणि बियाणांची जिल्ह्यात टंचाई नसल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. रेशन दुकानदारांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धान्य वाटपातही आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री हा नशिबाचा खेळमुख्यमंत्री होणे हा नशिबाचा खेळ आहे. पंधरा वर्षांपूर्वी मी मंत्री होतो, त्यावेळी देवेंद्र फडवणीस कोणीही नव्हते. ते मुख्यमंत्री झाले, असे पालकमंत्र्यांनी सांगताच, तुमच्या पक्षात तुम्हाला कोणी होऊ दिले नाही का? असे पत्रकारांनी त्यांना विचारताच ते म्हणाले, मुख्यमंत्री होणे हा नशिबाचा खेळ असतो.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसministerमंत्रीHasan Mushrifहसन मुश्रीफ