शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
2
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
3
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
4
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
5
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
6
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
7
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
8
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
9
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
10
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
11
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
12
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
13
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
14
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
15
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
16
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
17
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
18
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
19
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
20
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

By अरुण वाघमोडे | Published: July 03, 2024 6:31 PM

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मंगळवारी भेट घेऊन दिले मागणीचे पत्र

अरुण वाघमोडे, अहमदनगर: जिल्ह्यात विधानसभेचे बारापैकी संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत मात्र, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोले या मतदारसंघातही पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे अगामी विधानसभा निवडणुकीत हे चारही मदारसंघ पक्षाकडे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

याबाबत वाघ यांनी या दोन्ही नेत्यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. वाघ यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या विजयात काँग्रेसच सिंहाचा वाटा आहे.

जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. यात शिर्डी शिवसेना तर अहमदनगर राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभेच्या एकुण १२ जागा आहेत. यापैकी आपल्या काँग्रेसकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी ४ जागा मिळणे गरजेचे आहे. त्यात श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या जागा प्रधान्यक्रमाने घेणे गरजेचे असून जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची खूप चांगली ताकद असून या मतदारसंघातून आपल्या नेतृत्वातून व पक्ष संघटनामुळे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील. त्यामुळे १२ पैकी ७ विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे घ्यावेत, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस