शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे दिवासाआड पाणी

By | Published: December 05, 2020 4:33 AM

अहमदनगर : मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे नगरकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सक्षम ...

अहमदनगर : मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे नगरकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावर कळस असा की, केडगाव व कल्याण रोड परिसरात पाच ते सहा दिवसांनी पाणी येते.

नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होताे. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे २६ हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरण पूर्ण भरले होते. तसेच जायकवाडी धरणातही पाणी सोडण्यात आले होते. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला दरराेज पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने वितरण व्यवस्था सक्षम बनविण्याकडे सातत्याने दर्लक्ष केले. त्यात शहरातील लोकवस्ती वाढल्याने हद्दवाढीतील भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधींच्या पाणी योजना सुरू होऊन बराच काळ लोटला. परंतु, पाणीयोजना कार्यान्वित झालेल्या नाहीत.

मुळा धरणातून पाणीउपसा करून हे पाणी विळदघाट येथील उपकेंद्रात साठविले जाते. तेथून ते वसंत टेकडी येथील जलकुंभात साेडले जाते. वसंतटेकडी येथे ७० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा होताे. शहरात जुने २० जलकुंभ आहेत. शहर सुधारित पाणी योजनेंतर्गत नव्याने ८ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तसेच अमृत योजनेंतर्गत मुळा धरणातून नव्याने ३५ कि. मी. ची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे कामही अधर्वट असल्याने शहराला जुन्या जलवाहिनीतूनच पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी जुनी झाल्याने तिला गळती लागली आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

.....

प्रतिमानसी ८० लिटर पाणी

शहरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी द्यावे, असा संकेत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातूनही पुरेसे पाणी आहे. सन २०११ च्या जनगणेनुसार ३ लाख ५० हजार इतकी शहराची लोकसंख्या आहे. प्रत्येक व्यक्तीला सध्या ८० लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

....

२० टक्के पाणी गळती

मुळा धरण ते वसंतटेकडी हे अंतर ३५ कि.मी. इतके आहे. या मार्गावर २० टक्के पाण्याची गळती सुरू आहे. मुळा धरणातून उपसा केलेल्या पाण्यापैकी ८० टक्केच पाणी शहराला मिळते.

.....

फेज-२ ११६ कोटींवरून १२३ कोटींवर

शहराच्या पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन सन २०१० मध्ये शासनाने फेज-२ योजना मंजूर केली. सुमारे ११६ कोटींची ही योजना होती. मात्र, वेळेत पूर्ण न झाल्याने सदर योजना १२३ कोटींवर पोहोचली आहे.

.....

फेज-२ ला सात वर्षांची मुदतवाढ

शासनाने मंजूर केलेल्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सन २०१० मध्ये सुरू झाले. ही योजना पूर्ण करण्यासाठी २०१३ पर्यंत मुदत होती. परंतु, सदर योजना मुदतीत पूर्ण झाली नाही. त्यामुळे २०१३ ते २०२० या काळात वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. सात वर्षे उलटूनही ही योजना पूर्ण झाली नाही.

....

चाचणीविना नळजोडणी लांबणीवर

शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात ५६५ कि.मी. भूमिगत पाईप टाकण्यात आले आहेत. परंतु, या पाईपची चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नळजोडणी देण्यात आलेली नाही.

....

दुसऱ्या अमृत पाणी योजनेची मुदतही संपली

केंद्र शासनाने अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. सुमारे १०० कोटी खर्चून मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंत ३५ कि. मी. ची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत २२ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

....

- शहर सुधारित पाणीपुवठा व अमृत योजना येत्या मार्चपर्यंत पूर्ण हाेतील. विळघाट येथे वीज उपलब्ध होण्यासाठीची मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराला उन्हाळ्यात दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

- गणेश गाडळकर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा