शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

By सुदाम देशमुख | Published: June 02, 2024 4:15 PM

Ahmednagar: पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला.

घारगाव (अहमदनगर)  : पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला.

हरणांचा कळप कुरकुंडी परिसरातून शेळकेवाडी (अकलापूर) शिवारात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून जात असताना एका मादी जातीच्या हरणाला कारची जोरदार धडक लागली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी वनविभागास कळविले. त्यावेळी वनमजूर दीपक वायाळ यांनी घटनास्थळी येत मृत हरणाला महामार्गावरून बाजूला केले. मात्र, वनरक्षक व संबधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही. मृत हरणाला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत नेण्यात आले.

सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून नागरिकांसहित पशु पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाण्याच्या शोधात पशुपक्षी रस्त्यावर येतात आणि अशा प्रकारे अपघातात त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वन विभागाच्या वतीने पशू पक्ष्यांसाठी पशू प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाणवठे सुरू करण्याची गरज आहे. पाण्यासाठी भटकणाऱ्या प्राण्यांना अपघाताबरोबरच शिकारीचा धोका वाढला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरwildlifeवन्यजीवAccidentअपघात