शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
4
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
5
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
6
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
7
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
8
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
9
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
10
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
11
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
12
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
13
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
14
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
15
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
16
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
17
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
18
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
19
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
20
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

उपनगरांतील रस्त्यांची दुरुस्ती, नाले सफाई पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:20 AM

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील नेहरू मार्केट, फेज टू, तपोवन रास्ता, भिस्तबग रस्ता हे कधी पूर्ण ...

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील नेहरू मार्केट, फेज टू, तपोवन रास्ता, भिस्तबग रस्ता हे कधी पूर्ण होतील याविषयी कोणालाही, काहीही सांगता येणार नाही. कदाचित या प्रश्नावर आणखी दोन निवडणुका होऊन जातील तरी हे प्रश्न जागेवरच राहतील. नगर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे उपनगरात तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतीमध्ये प्रामुख्याने रस्त्यांची समस्या फार मोठी आहे. उपनगरातील काही रस्ते होऊन १०, १५ वर्षे झालेली आहेत. ते आता मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाले आहेत. ते रस्ते नव्याने पुन्हा करणे गरजेचे असले तरी त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हातात घेऊ नयेत. तथापि, त्या सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून जेथे मोठे खड्डे पडले आहेत, त्यांचे चांगल्या प्रकारे पॅचिग पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावे त्यासाठी आवश्यक ती योग्य प्रमाणात खडी व डांबर याचा वापर करण्याची गरज आहे. केवळ खड्डे मुरमाने भरले तर ते एक पावसात उघडण्याची शक्यता आहे.

उपनगरातील छोटे, मोठे नाले, गटारी यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथ रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना पावसाळ्यात अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागते. उपनगरात राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर, पाणीपट्टी दरवर्षी महापालिकेला नियमित भरत आहेत, याचा विचार करावा, असे शितोळे यांनी म्हटले आहे.