शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
4
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
5
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
7
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
8
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
9
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
10
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
11
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
13
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
15
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
16
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
18
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
19
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
20
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट

औषधांची विक्री ५० टक्के घटली.. तरीही सेवा नाही आटली; औषध विक्रेते बनले वॉरिअर्स 

By सुदाम देशमुख | Published: May 25, 2020 11:34 AM

ज्यावेळी रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हते, त्या लॉकडाऊनच्या काळात फक्त औषधांचीच दुकाने उघडी होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक डॉक्टरांचे दवाखाने बंद होते, तर रुग्णालाही तपासण्यास अनेक डॉक्टर घाबरत होते. या काळात १२ ते १४ तास सेवा देऊन औषध विक्रेते कोरोना वॉरिअर्स बनले.

सुदाम देशमुख /  अहमदनगर  : ज्यावेळी रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हते, त्या लॉकडाऊनच्या काळात फक्त औषधांचीच दुकाने उघडी होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक डॉक्टरांचे दवाखाने बंद होते, तर रुग्णालाही तपासण्यास अनेक डॉक्टर घाबरत होते. या काळात १२ ते १४ तास सेवा देऊन औषध विक्रेते कोरोना वॉरिअर्स बनले. या काळात मास्क, सॅनिटायझरची विक्री झाली तरी अन्य औषधांना मागणी नव्हती. लॉकडाऊनच्या काळात फक्त मधुमेह, रक्तदाब, शुगर या आजारांवरील औषधांचीच विक्री झाली. त्यामुळे नेहमीपेक्षा ५० टक्के विक्री घटल्याने औषध विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन अत्यंत कडक होता. या टप्प्यात फक्त औषध विक्रीचीच दुकाने उघडी होती. औषधांची ने-आण करताना अनेक औषध विक्रेत्यांना पोलिसांच्या काठ्या खाव्या लागल्या. तरीही सेवा चालू ठेवण्याचाच निर्धार विक्रेत्यांनी केला. तब्बल दोन महिन्यांपासून अनेक हॉस्पिटल बंद होती. अनेक डॉक्टरांचे बाह्य रुग्ण विभागही बंद होते. लोकांचे बाहेरचे खाणे, पिणे, फिरणे बंद झाल्याने आजाराचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे औषधांच्या विक्रीला फटका बसला. मधुमेह, शुगर, रक्तदाब यावरील औषधांचीच फक्त विक्री झाली. मास्क, सॅनिटायझरला मोठी मागणी होती. काही विक्रेत्यांनी मनमानी किमती आकारल्या. त्यावेळी संघटनेने त्यावर नियंत्रण आणत परिस्थितीचा गैरफायदा न घेण्याचा निर्धार केला. अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार १२ ते १४ तास दुकाने उघडी ठेवली.वाटसरुंना दिले जेवणऔषध विक्रीसोबतच लॉकडाऊनच्या काळात विक्रेत्यांनी अनेकांना मदत केली. पोलिसांना मास्क, सॅनिटायझर दिले. कोतवाली पोलीस ठाण्यात २५० पोलिसांना ‘हिपाटायटीस बी’चे लसीकरण केले. नागरिकांनी हॅण्डवॉश करावेत, यासाठी जागृती केली, विक्रेत्यांनी दुकानासमोर तसे फलक लावले. प्रिस्क्रीप्शनशिवाय सर्दी-खोकल्याच्या गोळ््या-औषधे कोणालाही दिली नाहीत. मास्क ५० रुपयांच्या पुढे न विकण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला. महामार्गावर पायी येणाºयांना चार-पाच दिवस सलग जेवण दिले. पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने ही कामे केली, असे संघटनेचे सदस्य देविदास काळे यांनी सांगितले.विक्रेत्यांनाही वाटले होते घरी बसावेलॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत होता, घरात होता. दुकाने बंद ठेवून घरीच बसावे, असे औषध विक्रेत्यांच्या कुटुंबीयांनाही वाटत होते. अशावेळी सुरवातीच्या काळात औषधांची ने-आण करताना अनेक विक्रेत्यांना त्रास झाला. त्यात पुणे, नाशिकमध्ये विक्रेते कोरोनाबाधित आढळले. अशावेळी दुकान बंद करण्याचा विचार आला. मात्र संघटनेने आमचे मनोधैर्य उंचावले, म्हणून दुकान उघडे ठेऊ शकलो, असे विक्रेते मनोज खेडकर यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात शहरातील ११०० ते १२०० औषध विक्रेत्यांनी अविरत सेवा दिली. औषध विक्रेते हे सुद्धा कोरोना वॉरिअर्स आहेत. संकटकाळात व्यवसाय, आर्थिक फायद्यापेक्षा सेवा देण्यावर भर होता. पहिल्या टप्प्यात पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. नंतर मात्र पोलिसांचे खूप सहकार्य मिळाले, म्हणून लोकांची सेवा करू शकलो. पुण्यामध्ये ३८ औषध विक्रेत्यांना, तर नाशिकमध्ये पाच ते सहा औषध विक्रेत्यांना कोरोना झाला. मात्र नगरमध्ये सर्व विक्रेत्यांनी काळजी घेत सेवा केल्याने एकही संशयितसुद्धा झाला नाही, हेच मोठे समाधान आहे. -दत्ता गाडळकर, अध्यक्ष, शहर केमिस्ट असोसिएशन