शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अहमदनगर : उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तक मिळणार घरपोहोच

By चंद्रकांत शेळके | Updated: April 27, 2023 17:25 IST

याशिवाय विद्यार्थ्यांची प्रगतिपुस्तकेही शिक्षकांनीच घरपोहोच करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. 

अहमदनगर : यंदा विदर्भासह सर्व महाराष्ट्रातच उष्णतेची लाट आलेली असल्याने उष्माघाताचा धोका लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना १० दिवस आधीच सुटी जाहीर झाली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची प्रगतिपुस्तकेही शिक्षकांनीच घरपोहोच करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. 

राज्यभर यंदा प्रचंड उन्हाचा कडाका आहे. त्यामुळे राज्यात उष्माघाताने अनेकांना त्रास झाला. खारघर येेथे झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला. त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूूमीवर शिक्षण विभागही सतर्क झाला. उन्हाचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर म्हणजे २१ एप्रिलपासूनच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जाहीर केली.

दरवर्षी १ मे रोजी प्राथमिक शाळांचा निकाल प्रसिद्ध होतो. विद्यार्थ्यांसह पालकांना शाळेत बोलावून त्यांचे प्रगतिपुस्तक दिले जाते. परंतु वाढती उष्णता लक्षात घेता यंदा विद्यार्थी किंवा पालकांना शाळेत न बोलावता निकालाचे प्रगतिपुस्तक शिक्षकांनी विद्यार्थ्याला घरपोहोच करावे, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. 

पहिली ते नववीपर्यंतच्या जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तक घरपोहोच द्यावे लागणार आहे. या आदेशामुळे शिक्षकांचे काम मात्र वाढले आहे. दरम्यान, सुटीनंतर शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत.