शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींच्या सभेत भावूक, अनेकांना दिलीप गांधींच्या 'त्या' भाषणाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 08:28 IST

डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते.

ठळक मुद्देडॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते.

अहमदनगर - भाजपा नेते माजी खासदार दिलीप गांधी यांचे आज पहाटे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे, अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला असून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. गत लोकसभा निवडणुकांवेळी भाजपाने दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारुन डॉ. सुजय विखे यांना तिकीट दिलं. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठपणाने पक्षाचं काम केलं. सुजय विखेंच्या विजयासाठी मोलाचे प्रयत्न केले होते. दरम्यान, याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान बोलताना ते भावूक झाले होते. .  

डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते. नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही क्षण अगोदर ही घटना घडली. मात्र, उमेदवार डॉ. सुजय विखेंनी सर तुम्ही बोला अशी विनंती केल्यानंतर गांधी पुन्हा बोलायला लागले. पण, बोलताना त्यांचा कंट दाटला होता. मनस्वी आलेला राग गिळताना दिलीप गांधींच्या डोळे पाणावल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. भावुक झालेल्या दिलीप गांधींची नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा नगरमध्ये चर्चेचा विषय बनली होती.    

अन...खासदार दिलीप गांधी भडकले

दिलीप गांधी यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. त्यामुळे ते भडकले. गांधी म्हणाले, दोन मिनिटात, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत ते सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर भाषणात दिलीप गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षावर त्यांची प्रामाणिक निष्ठा आणि प्रेम होते. त्यामुळेच, तीनवेळा खासदार एकवेळा केंद्रीयमंत्री पद मिळविल्यानंतरही पक्षाने 2019 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ता बनून भाजपाचं काम केलं. डॉ. सुजय विखेंच्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.   

टॅग्स :Dilip Gandhiखा. दिलीप गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीSujay Vikheसुजय विखे