शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खर्डा हत्याकांडाच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना, खासदार अमर साबळे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:24 IST

खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही संपूर्ण तपास प्रक्रिया संशयास्पद असल्याने सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे.

अहमदनगर : खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही संपूर्ण तपास प्रक्रिया संशयास्पद असल्याने सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे. त्यापूर्वी या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती पोलीस तपास आणि न्यायालयीन तपास प्रक्रियेचा अभ्यास करणार असल्याचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.साबळे म्हणाले, खर्डा हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने मी आगे कुटुंबीयांना भेट देऊन सात्वंन केले आहे. आम्ही प्राधान्याने आगे कुटुंबीयास पोलीस संरक्षण देणार आहोत. त्यानंतर आरोपींना शिक्षा होण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत. अ‍ॅट्रासिटीअंतर्गत कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सरकार हाताळणार आहे. तपासाअंतर्गत हलगर्जीपणा तसेच जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. चांगला वकील नेमून हे प्रकरण हाताळण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या अभ्यासासाठी समिती नेमण्यात येणार आहे़ शासनाचे निधी खाते, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व जिल्हा सरकारी वकील यांचा या समितीमध्ये समावेश असेल. ही समिती एफआयआर दाखल होण्यापासून निकालापर्यंतचा सखोल अभ्यास करेल. ही सर्व प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे. मुख्यंमत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मी आगे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणात शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची साबळे यांनी सांगितले.

रयतच्या संचालकांना कारवाई करण्यास सांगणार

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक समरसता व सत्याचे धडे या संस्थेमधून दिले जातात. मात्र खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतीलच कर्मचारी फितूर झाले. त्यामुळे संस्थाअंतर्गत त्यांची चौकशी करावी. या कर्मचा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत शिक्षण संस्थेच्या संचालकांकडे करणार असल्याचेही अमर साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर