शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

...म्हणून शेतात बुजगावणं वापरू नका; चिमण्या-पाखरांवर 'ममता' करणाऱ्या शेतकरी महिलेची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:50 AM

पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.

सुदाम देशमुख अहमदनगर : पाखरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बुजगावणे वापरतात. मात्र अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ममताबाई भांगरे या बुजगावण्याशिवाय शेती करा असा धडा जगाला देत आहेत. पाखरांना दाणापाणी द्या. त्यातून शेतातील कीड नष्ट होऊन उत्पादन वाढते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत.देवगाव (ता. अकोले) येथील ममताबाई या हजारांच्यावर चिमण्या-पाखरांच्या अन्नदाता बनल्या आहेत. त्या म्हणतात, शेतकऱ्यांनी पाखरांना दाणापाणी भरविण्याची खबरदारी घ्यायला हवी. मात्र, शेतकरीच आज पाखरांना दूर लोटू पाहत आहेत. जे अयोग्य आहे.माझ्या अंगणात असलेल्या बोगणवेलावर दररोज शेकडो चिमण्या बागडतात. दिवसातून तीन वेळामी त्यांना तांदूळ टाकते. त्यामुळेमी अंगणात गेले तरी चिमण्या चिवचिवाट करुन माझ्यावरील प्रेम व्यक्त करतात. वर्षात तांदळाचे एक पोते मी या चिमण्यांनाच खाऊ घालते.आपल्या शेतातही पाखरांना मुक्त प्रवेश आहे. पाखरे हाकलण्यासाठी मी शेतात कधीही बुजगावणे उभे करत नाही. त्यामुळे पाखरे मनसोक्तपणे पिकांशी खेळतात. याचा फायदा असा होतो की पिकांवर असलेले किटकही पाखरे खाऊन टाकतात.तेच खरे पिकांचे राखण करतात. त्यामुळे माझ्या शेतात पिकांवर रोग येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रासायनिक फवारण्या करण्याचीगरज पडत नाही.पाखरांनी काही अन्न खाल्ले तरी आपणाला चांगले उत्पादन मिळते. पाखरांचा किलबिलाट हे एकप्रकारचे संगीतच असते. त्याचाही पिकांना फायदा मिळतो, असेही त्यांचे म्हणणे आहे.>आश्रमशाळांतील मुलांना सेंद्रिय भाजीपालाममताबाई १0 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे प्रयोग करत आहेत. ‘बायफ’ या संस्थेकडून त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतले. गांडूळ खताच्या छोट्या गोळ्या त्या तयार करतात. चिखलात भाताच्या रोपांमध्ये या गोळ्या पेरतात. त्यामुळे पिकांना चांगले खत मिळून उत्पादन वाढते, असा त्यांचा निष्कर्ष आहे. अकोले तालुक्यातील शेणित, मुतखेल, मान्हेरे या आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना त्यांनी सेंद्रिय शेतीचे धडे दिले. त्यामुळे या शाळा आपला भाजीपाला या खतांवरच तयार करतात. सर्वच आश्रमशाळांनी याची अंमलबजावणी केली तर मुलांना सकस अन्न मिळेल, असे ममताबार्इंचे म्हणणे आहे.