शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

शेतक-यांनी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरावे; डॉ. सी. वासुदेवप्पा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 3:42 PM

शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. 

राहुरी :  शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आधुनिक काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनीपत (हरियाणा) येथील अन्न तंत्रज्ञान व्यवसायीकरण व व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु डॉ. सी. वासुदेवप्पा यांनी केले. 

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती, जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत स्मार्ट प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर दोन आठवड्यांचे आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी शनिवारी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. वासुदेवप्पा बोलत होते.

 अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ.के.के.सिंग,डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ.दिलीप पवार, डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, डॉ.मिलिंद अहिरे, डॉ.उत्तम चव्हाण, डॉ.सुनील गोरटीवार, डॉ.मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.विक्रम कड उपस्थित होते. 

शेतीमालापासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धीत पदार्थ बनविल्यास लोकांना चांगल्या प्रतिचे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांचे आरोग्य चांगले राहिल. सद्यस्थितीमध्ये भारतात शेतीमालाच्या नुकसानीचे प्रमाण खूप मोठे आहे. जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान शेतीमालाच्या काढणी केल्यापासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत होते. त्याला असंख्य कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण शेतीमालाची हाताळणी हे होय. त्यासाठीच नवीन तंत्रज्ञानाचा पवार करण्याची गरज आहे, असेही वासुदेवप्पा यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीAgriculture Sectorशेती क्षेत्रuniversityविद्यापीठ