शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

पंचनामे न केल्याने शेतक-यांनी रस्त्यावर फेकली संत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:24 PM

खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

अहमदनगर : नगर तालुक्यातील काही भागात रविवारी रात्री वादळी वारा आणि अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला. त्यात खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी मंगळवारी सकाळी वादळी वा-याने गळालेली संत्री रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.नगर तालुक्यातील खडकी परिसराला संत्रा फळबागांचे आगर मानले जाते. खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, सारोळा कासार या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबागा आहेत. खडकी परिसरात ५०० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास या भागात मोठ्या प्रमाणावर वारा व तुरळक पाऊस झाल्याने तोडणीला आलेल्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी माहिती होऊनही कोणताही प्रशासकीय अधिकारी या भागात पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मंगळवारी सकाळीच गळालेल्या फळांसह नगर- दौंड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राहुल बहिरट, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठूळे, उपसरपंच रोकडे, केतन निकम, ऋषी कोठूळे, राहुल कोठूळे, अशोक कोठूळे, अमृत कोठूळे, नवनाथ कोठूळे, रतन बहिरट, अर्जुन रोकडे, आदिनाथ गायकवाड, प्रवीण कोठूळे, सुनील कोठूळे, भाऊसाहेब खेंगट यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांनी शेतक-यांची समजूत काढली. सरकार आपले आहे. आपण या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे प्रशासनास करण्यास सांगू, असे सांगत आंदोलन न करण्याची विनंती केली. शेतकºयांनीही आंदोलन मागे घेत फळे रस्त्यावर फेकून प्रशासकीय धोरणांचा निषेध केला व तातडीने पंचनामे करत हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीStrikeसंप