शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
11
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 4:21 PM

प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे.

लोणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना, ऊसापासून इथेनॉलची निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाच्या स्विकारलेल्या धोरणामागे स्व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार आहे. इतरांसारखे शेतक-यांना केवळ मोर्चे काढायला आम्ही लावले नाहीत, शेतक-यांची सुरक्षितता देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.वाजपेयी सरकारने हाती घेतलेले धोरण पुन्हा एकदा केंद्र सरकारने पुढे नेण्यास प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रकात पाटील यांनी केले.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या 87 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात पाटील बोलत होते. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. यशवंत थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, सभापती दिपकराव पठारे, सुभाषराव पाटील, राजेश परजणे, अशोकराव भांगरे उपस्थित होते. कारखाना कार्यस्?थळावरील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाजंली अर्पन करुन अभिवादन केले.पाटील म्हणाले, केवळ कर्जमाफी देवून शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर, शेतामध्ये पाणी पोहचल्यानंतरच शेतकरी स्वाभिमानी बनेल. यासाठीच जलयुक्त शिवाराचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला. राज्य सरकारचे हे धोरण म्हणजे डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या विचारांशी सुसंगत असे आहे. केंद्र सरकारने आता केवळ पाण्यासाठी 24 हजार कोटी रुपयांची उपलब्धता करुन दिली असून, या माध्यमातून बंद पडलेले जलसिंचन प्रकल्प सुरु करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. मधल्या काळात देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्यांकडून शेतक-यांचा विचार झालाच नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील