शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अखेर १२५ प्राथमिक शिक्षक परतले स्वगृही

By चंद्रकांत शेळके | Updated: July 9, 2024 18:12 IST

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्त्या : अनेकांना मिळाली सोयीची ठिकाणे

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, मग नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता यामुळे आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यांतून बदलून आलेले १२५ प्राथमिक शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर मंगळवारी या शिक्षकांना आपापल्या तालुक्यांत रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. नोकरीच्या पहिल्या दिवसांपासून हे शिक्षक परजिल्ह्यात कार्यरत होते. यातील काहींना १०, तर काहींना त्याहीपेक्षा अधिक काळ या जिल्ह्यांत झाले होते. अनेकजण कोकण, मुंबई अशा दूरवर कार्यरत होते. या शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यात बदली मिळावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालवले होते. परंतु दरवर्षी मर्यादित जागा असल्याने सर्वांना सामावून घेता येत नव्हते.

यावर्षी मात्र या शिक्षकांना संधी मिळाली. त्यानुसार त्यांच्या जिल्ह्यातून ते कार्यमुक्तही झाले. परंतु नगर जिल्हा परिषदेत हजर होताना त्यांना लोकसभा निवडणूक व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचा अडसर आला.

आता आचारसंहिता संपल्याने जिल्हा परिषदेने या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत ९ जुलै रोजी समुपदेशन प्रक्रिया पार पाडली. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय २३ मे २०२३ च्या तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने अहमदनगर जिल्ह्यात हजर झालेल्या १२५ प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना करण्यासाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी नियोजन करून मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली. या प्रक्रियेमध्ये प्रथम पेसा क्षेत्रात इच्छुक असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. नंतर संवर्ग १ तसेच संवर्ग २ व शेवटी सर्वसाधारण या प्राधान्यक्रमाने हजर प्राथमिक शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार पदस्थापना देण्यात आली. रिक्त जागा जास्त असल्याने अनेकांना यात आपापला तालुकाही मिळाला.रिक्त जागांवर मिळणार शिक्षक

जिल्ह्यात सध्या प्राथमिक शिक्षकांची ४३६ पदे रिक्त आहेत. आता १२५ शिक्षकांना पदस्थापना दिल्याने शाळास्तरावर रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकांची नियुक्ती होऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील रिक्त्त पदांची संख्या कमी होणार आहे.

जिल्हांतर्गत बदल्यांबाबत संभ्रम

आंतरजिल्हाप्रमाणे जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे. त्यासाठी साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत. परंतु त्याला अद्याप मुहूर्त लागलेेला नाही. काही जिल्ह्यांत अशा बदल्या झाल्या. मात्र नगर जिल्हा परिषद ही प्रक्रिया राबवणार आहे किंवा नाही? याबाबत शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक