शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

सोन्यासारखी ढोबळी मिरची मातीमोल; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 2:22 PM

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.

पिंपळगाव माळवी : जगासह देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोना या महाभयंकर आजाराने शेतक-यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतक-यांवर आर्थिक कु-हाड कोसळली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तरुण शेतकरी सागर रोहिदास गुंड यांनी आपल्या पॉलिहाऊसमध्ये दहा गुंठे रंगीत ढोबळी मिरची पीक घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे मागणीअभावी ढोबळी मिरची त्यांना फेकून द्यावी लागली आहे.सागर गुंड यांनी आपल्या शेतीमध्ये बँकेकडून कर्ज घेऊन पॉलिहाऊस बांधले असून दहा गुंठ्यांमध्ये तीन हजार रंगीत ढोबळी मिरची रोपांची लागवड केली होती. मशागत, औषध फवारणी यावर दीड लाख रुपये खर्च केला होता. या मिरची पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा गुंड यांना होती. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बाजारपेठा ठप्प झाल्यामुळे या मिरचीला मागणी नाही. त्यामुळे गुंड यांनी रंगवलेल्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला. गुंड यांनी रोजाने शेत मजूर लावून मिरची तोडून बांधावर फेकून दिली आहे. मागणी नसल्यामुळे  त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

डिसेंबर महिन्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली होती. कुटुंबासह रात्रंदिवस कष्ट घेतले. समाधानकारक पीक आले. परंतु मागणीअभावी चार टन माल फेकून द्यावा लागला. अजून तीन महिने उत्पादन होईल, परंंतु लॉकडाऊन असाच राहिला तर बरबाद होण्याची वेळ निश्चितच येईल, असे शेतकरी सागर गुंड यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी