शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

मराठा आरक्षणासाठी लढणा-या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न; राधाकृष्ण विखे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:10 PM

राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणाºया संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा,  असे आवाहन करुन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकावर निशाणा साधला.

अहमदनगर : राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणा-या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा,  असे आवाहन करुन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकावर निशाणा साधला.

नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विखे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी धरसोड झाली, त्याचा परिणाम म्हणजे सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. आता पाच न्यायमूर्तींच्या बेंचपुढे हे प्रकरण जाणार आहे. आरक्षणासाठी सर्व संघटना एकत्र आल्या तरच सरकार वटणीवर येईल. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाही. मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती नेमली होती. परंतु या समितीतील सदस्यांना किती गांर्भिय आहे ? कारण ते बैठकांना हजर नव्हते. आरक्षणाच्या बाबतीत सध्या काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, हे त्यांना माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात जे सरकारने विशेष वकिल नेमले आहेत, त्यांना फी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. फी ची तरतूद सरकार करू शकले नाही. सरकार हे वेळकाढूपणा करीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, त्यांना आरक्षण द्यायचे नाही, अशी टिकाही विखे यांनी यावेळी केली. 

कांदा निर्यातबंदी उठवणे किंवा लावणे, हे आज घेतलेले धोरण नाही. राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. केंद्र सरकार याला जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पण पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना त्याच्या काळात किती वेळा कांदा निर्यातबंदी करावी लागली, याची त्यांना आठवण कोणीतरी करून दिली पाहिजे. सरकारला त्या-त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय करावे लागतात, त्यांना याची कल्पना आहे. त्यामुळे केंद्रावर आरोप करून चालणार नाही. निर्यातबंदी करू नये, ही आमची देखील मागणी होती. शेतकºयांच्या शेतीमालाला निर्यातबंदी करावी, ही भूमिका नसावा, या मताचा मी आहे, असेही विखे म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण