शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

By शेखर पानसरे | Published: March 17, 2023 3:05 PM

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला.

संगमनेर (अहमदनगर) : हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात कंपनीला निवेदन दिले होते. मात्र, निवेदनाची कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर रस्ते आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. १७) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझा कामगार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप लबडे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस काम बंद आंदोलन आणि त्यानंतर शुक्रवारपासून उपोषणाचा मार्ग कर्मचाऱ्यांनी अवलंबला आहे. निलेश सरोदे, सागर मुंगसे, संतोष पोखरकर, किसन वाळे, विलास धात्रक, विवेक वाळे हे कर्मचारी उपोषणाला बसले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे. असे त्यांनी सांगितले. २०१७ पासून काम करताना कर्मचाऱ्यांची पगारवाढ झालेली नाही. त्यासंदर्भात १० जानेवारी २०२३ ला निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांची मार्च महिन्यात पगारवाढ करण्यात येईल, असे आश्वासन मिळाले होते; परंतु आजपर्यंत कोणीतही पगारवाढ झालेली नाही. कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम मिळाला पाहिजे. आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.