शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

राष्ट्रवादीत बेईमानांना शिक्षा नाही, इमानदारांची कदर नाही; राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाची टीका

By साहेबराव नरसाळे | Updated: June 16, 2023 18:09 IST

पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.

अहमदनगर - राष्ट्रवादी पक्षात गेली २३ वर्ष आपण प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जे कृषीविषयक धोरण आहे, अगदी त्याच्या उलट धोरण पक्षातील लोकं राबवितात. पक्षात बेईमान नेत्यांचा भरणा होत असून, सध्या पक्ष राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला आहे. पक्षातील बेईमान लोकांच्या अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, पक्षा त्यांच्यावर काहीही कार्यवाही करीत नाही. तसेच पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.

शेलार यांनी शुक्रवारी (दि. १६) येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, १४ जून रोजी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शेतकऱ्यांविषयी अत्यंत स्पष्ट धोरण होते. परंतु पक्षातील लोकं अगदी त्याविरोधात भूमिका घेतात. अनेक कारखानदार नेते शेतकऱ्यांची देणी देत नाहीत. एफआरपीप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट देत नाहीत. पक्षातील अशा नेत्यांची व पक्षविरोधी भूमिका घेऊन विरोधी पक्षांना निवडणुकीत मदत करणाऱ्यांची आपण अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पण उपयोग झाला नाही.

राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांचा कल्याणकारी पक्ष होईल, अशा अपेक्षेने आपण अनेक वर्ष मृगजळाच्या मागे धावत होतो. पण आता वास्तविक आशेचा किरण बीआरएसच्या रुपाने दिसला आहे. बीआरएसने तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना सुखी जीवन दिले आहे. महाराष्ट्रात व देशातही हा बीआरएस पॅटर्न लागू व्हावा, यासाठी आपण बीआरएस पक्षात दाखल झालेलो आहे. पक्षाची आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागा लढण्यासाठी पक्षाची तयारी सुरु आहे, असेही शेलार म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस