शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

नगर जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल याची तारीख सांगणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:59 AM

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा ३१ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी केली होती. मात्र त्यानंतर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढतच गेली. कोरोनामुक्त होण्याऐवजी जिल्ह्याचा आकडा सव्वा दोनशेच्या पुढे सरकला. त्यामुळे जिल्हा कधी कोरोनामुक्त होईल, याचा मुहुर्त सांगणे कठीण आहे, अशी कबुली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांचे हे वाक्य ऐकून जिल्हाधिकाºयांसह उपस्थित अधिकाºयांची चिंता वाढली.पालकमंत्री मुश्रिफ यांनी आपणच केलेल्या घोषणेची आठवण झाली. पत्रकारांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी हा खुलासा सुरवातीलाच करून टाकला. लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावर मोठी गर्दी होते आहे. भाजीपाला खरेदीसाठी लोकांची उडी पडते आहे. काही लोक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते आहे. ही सर्व परिस्थितीचे मुश्रीफ यांनी अवलोकन केले असावे. म्हणून तेही हतबल झाल्याचे पहायला मिळाले.जिल्हा एक जून रोजी कोरोनामुक्त होईल, अशी घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील आकडा दोनशेपार गेला. अधिकाºयांनी प्रयत्न केले, मात्र त्याला दृष्ट लागली. लोक बाहेरून येत राहिले आणि कोरोनाची संख्या वाढत गेली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आता तारीख सांगणे अवघड आहे. मात्र लवकरात लवकर जिल्हा कोरोनामुक्त होईल, हे आता सांगतो, असे मुश्रीफ म्हणाले.जिल्ह्यात आतापर्यंत २३२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील १६१ जण घरी परतले आहेत. मृत्यू झाले हे दुर्दैव आहे. आता येथून पुढे एकही मृत्यू होणार नाही, याची प्रशासनाला काळजी घ्यायची आहे.  कोणाला लक्षणे नसतील तर तपासणीची गरज नाही. मात्र ज्यांना लक्षणे आहेत, त्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. परगावाहून आलेल्या ३३ हजार २९९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आता फक्त ६ हजार ९६३ जण क्वारंटाईन आहेत. लस मिळेपर्यंत स्थिती पूर्ववत होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे.जे गोरगरीब आहेत, त्यांना धान्य देण्याची योजना सरकारने आणली आहे. महिनाभरात त्यांना धान्य दिले जाईल. कधी डाळ, तर कधी  चणा देण्याचे काम सुरू होईल, रेशनकार्ड ज्यांना नाही, अशानांही धान्य देण्याचे नियोजन आहे.----------प्रशासनात समन्वयाचा अभावसंगमनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोनाने तीन महिलांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून दोन महिलांची मृत्यू झाल्याची माहिती दिली जात होती. अशावेळी संभ्रम तयार होतो. याबाबत प्रशासनाचा असमन्वय दिसतो, असे पत्रकारांनी छेडल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: पुढे येत उत्तर दिले. तिसरी महिला थेट मुंबई येथून जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यामुळे त्या महिलेचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे तीनच महिलांची माहिती दिली जात होती, असे सांगितले.