शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

कल्याण रोड परिसर टाकतोय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेला कल्याण रोड परिसर आता कात टाकतोय. नवनवीन इमारती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेला कल्याण रोड परिसर आता कात टाकतोय. नवनवीन इमारती उभ्या राहत असून, आदर्श म्हणता येतील, अशा कॉलनी उभ्या राहत आहेत. म्हणूनच फूडमॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोलपंप, सुसज्ज दवाखाने, जॉगिंग ट्रॅक, बगिचा अशा सुविधा या भागात उभ्या राहिल्या आहेत. त्याशिवाय अनेक छोट्या-छोट्या उद्योगांनीही या भागाच्या विकासाला हातभार लावला आहे.

अहमदनगर शहर आता ५३१ वर्षांचे झाले आहे. मध्यवस्तीतील अनेकजण आता नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये राहायला जात आहेत. कल्याण रोड परिसरही आता एक नवीन उपनगर म्हणून उदयास आले आहे. शिवाजीनगर, आदर्शनगर, विद्या कॉलनी अशा उच्चशिक्षितांच्या कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. नव्यानेही अनेक कॉलनींची यात भर पडली आहे.

मागील २० वर्षांच्या तुलनेत कल्याण रोड परिसराला चांगलीच झळाळी आली आहे. पूर्वी वेड्या बाभळींनी हा परिसर वेढलेला होता. रात्रीच्या वेळी सीना नदी ओलांडून येण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. मात्र, आता हा परिसर माणसांनी गजबजला असून, चकाचक बंगले, कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. सिमेंट, डांबरी मुलाम्याने अंतर्गत रस्ते चकाचक झाले आहेत. त्यामुळे या भागात फूडमॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले. बाजारपेठ उदयास आली. सुसज्ज दवाखान्यांनी या भागातील नागरिकांचे आरोग्य जपण्यात सहयोग दिला. दळणवळणाची लाइफलाइन असलेला पेट्रोलपंपही या भागात सुरू झाला. मंगल कार्यालये उभी राहिली. नागरिकांना मॉर्निंग वॉकला जाता यावे यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला. लोकांच्या विरंगुळ्यासाठी ३५ लाख रुपये खर्चून बगिचा उभा करण्यात आला आहे.

गणपती कारखान्यांसह इतर छोट्या उद्योगांनी या परिसरातील गरजूंना रोजगारही पुरविला आहे.

........................

पाणीप्रश्न सुटणे गरजेचे

कल्याण रोड परिसराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या लोकसंख्येला मात्र अद्यापही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या भागासाठी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याची योजना आखली होती. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, अद्यापही ती बंदच आहे. त्यामुळे सध्या तीन लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीतून या भागाला पाणीपुरवठा होत आहे. आठ ते दहा दिवसांनी या भागात पिण्याचे पाणी सुटते. ही या भागातील गंभीर समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

...................

गटारींसाठी २८ कोटी मंजूर

नगर-कल्याण महामार्गालगत गटार काढण्यात आली नव्हती. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा होत नव्हता. मात्र, आता या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या गटारीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या गटारींची कामे झाल्यानंतर या भागातील पाणी निचऱ्याचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.

................

जॉगिंग ट्रॅक, लॉन व ओपन स्पेस विकास अशी काही कामे मार्गी लावली आहेत. या भागातील पाणीप्रश्न व इतर सुविधांसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. आयुक्त शंकर गोरे यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत असून, विकासकामांचे नियोजन करून हा परिसर आदर्श करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.

-श्याम नळकांडे, नगरसेवक

..............

या भागात चांगले मॉल उभे राहत आहेत. होलसेलची मोठी दुकाने सुरू होत आहेत. महामार्गालगत असल्यामुळे बाजारपेठ विकसित होत आहे. मात्र, महापालिकेकडून सुविधा मिळत नाहीत. पाणीप्रश्न ही येथील मोठी समस्या आहे. फेज-२चे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. येथील बाजारपेठेला चांगले दिवस यायचे असतील तर महापालिकेने पाणीप्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

-अंबादास नरसाळे, उद्योजक