शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

विद्यमान सरपंचांनाच निवडणूक होईपर्यंत पदावर ठेवा; सरपंच परिषदेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 4:43 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच पदावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

अहमदनगर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सरकारने सुरु केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी सरपंच पदावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका मार्च ते जूनपर्यंत होणे अपेक्षित होते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारने हालचाली चालू केल्या आहेत. पुढील टप्प्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले आहे. 

कोरोना निर्मुलनामध्ये ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. गावातील सरपंच, उपसरंपच, सदस्य गावात चांगले काम करीत आहेत. मात्र, आता राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्यास मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक न करता सरपंचांना निवडणूक निर्णय होईपर्यंत त्याच पदावर कायम ठेवावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे, महिला राज्याध्यक्षा राणीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड़ विकास जाधव आदींनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरElectionनिवडणूक 2024gram panchayatग्राम पंचायत