शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

दहशतवाद विरोधी दिवस/‘कोरोना’च्या दहशतीविरोधात खाकीतला वॉरिअर्स लढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:53 AM

अहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : घटना कोणतीही असो जेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो, मानवी जीविताला धोका निर्माण होतो तेथे पोलीस नावाचा योद्धा जनतेच्या संरक्षणासाठी उभा राहतो. आज जगभरासह आपल्याकडेही कोरोना या साथीच्या आजाराची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या दहशतीला हरविण्यासाठी खाकी वर्दीतला वॉरिअर्स अविरत कार्यरत आहे. जिल्हा पोलीस दलाने उपलब्ध मनुष्यबळ व आहे त्या यंत्रणेवर काम करत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.विस्ताराने महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याची आज ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सध्या जिल्ह्यात मात्र अवघे ३२०० पोलीस कार्यरत आहेत. यात वयाची पन्नाशी ओलांडणारे एक हजारच्या आसपास पोलीस आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ८०० पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. जनतेच्या संरक्षणासाठी मात्र या आजाराची भीती दूर सारून जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस दररोज सकाळी ड्युटीसाठी घराबाहेर पडत आहे. कामाचा ताण वाढल्याने अनेक ठिकाणी पोलिसांना तब्बल सोळा ते अठरा तास ड्युटी करण्याची वेळ आली आहे. गर्दी कमी करणे, वाहनांची तपासणी, स्थलांतरितांना सुरक्षित पोहोचविणे, विविध ठिकाणी बंदोबस्त, अवैध व्यवसायांवर कारवाई अशी एक ना अनेक कामे सध्या पोलिसांना आहेत. रस्त्यावर आॅन ड्युटी चोवीस तास उभा राहणाºया पोलिसांमुळे कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.----

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने नगर जिल्ह्याला बाहेरचा बंदोबस्त मिळालेला नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळातच कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा कर्मचाºयांना फिल्डवरती काम न देता कार्यालयीन काम देण्यात आलेले आहे. वैद्यकीय उपचारासाठी ज्यांना रजेची गरज आहे, त्या कर्मचाºयांना रजा देण्यात आलेली आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे आपले कर्तव्य निभावत आहेत.    

- डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक