शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

कामगार आयुक्तांनी रेल्वे कामगारांच्या दरवाढीसंदर्भात मागविला अहवाल

By साहेबराव नरसाळे | Updated: June 23, 2023 15:55 IST

आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता प्रश्न

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही दरवाढ मिळावी यासाठी  राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी  राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आयुक्तांनी नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांच्याकडून दरवाढी अंमलबजावणीबाबत अहवाल मागविला आहे.

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे माथाडी कामगार दरवाढीसाठी लढा देत आहेत. मागील महिन्यात काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगार नेते विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त देशमुख यांची मुंबईतील कामगार भवनात भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आ.थोरात यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आयुक्तांना सूचना केल्या होत्या. काळे म्हणाले, मागील सुमारे तीन वर्षांपासून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा दरवाढीचा फरक कामगारांना हुंडेकरी ठेकेदारांनी अदा केलेला नाही. कामगार अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मालधक्क्यावर जीव धोक्यात घालून काम करत असतात. मध्यंतरी एका कामगाराचा काम करत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतरची मदतही अद्याप मयत कामगाराच्या वारसांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार यांनी गोरगरीब कामगारांचे कोट्यावधी रूपये थकवले आहेत. ते कामगारांना मिळवून देण्यासाठी आ. थोरात यांच्या माध्यमातून शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

कामगार नेते विलास उबाळे म्हणाले, मंडळाचे अध्यक्ष कवले यांनी कामगारांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. वास्तविक पाहता वसुली संदर्भात कारवाई सुरू करून दोन महिने उलटले आहेत. आता स्वतः राज्याच्या आयुक्तांनी देखील अहवाल मागविला आहे. त्यामुळे मंडळाने विनाविलंब वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलावीत.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात