शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

नगर जिल्ह्यात उसाच्या एफआरपीत यंदा मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:43 PM

मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

शिवाजी पवार

श्रीरामपूर : मागील वर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या साखर उताऱ्याचा फटका यंदाच्या ऊस दराला बसला आहे. त्यामुळे यंदा बहुतांश कारखान्यांचा एफआरपी कमी निघाला आहे. मागील हंगामात टनाला अडीच हजार रुपयांवर दर मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठी झळ सोसावी लागणार आहे.

नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना त्यांचा एफआरपी निश्चित करून पत्रे पाठवली आहेत. कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला तरी शेतकऱ्यांना उसाचे दर माहिती झाले नव्हते. त्यामुळे एफआरपीबाबत उत्सुकता होती. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत मौन पाळले होते. त्यामागील कारण याच पत्रात दडले आहे. शेतकरी व सभासदांची नाराजी नको म्हणून कोणीही दर जाहीर करण्याचे धाडस दाखविले नाही. पूर्वी अनेक कारखाने हंगामाच्या प्रारंभी दर जाहीर करून उसाची पळवापळवी करीत होते.

चालू गाळप हंगामात सर्वच कारखान्यांकडे मुबलक व किंबहुना वाढीव ऊस आहे. त्यामुळे वाढीव दराच्या स्पर्धेपासून कारखानदार दूर राहिले. मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी पंढरपूर, नंदूरबार, धुळे जिल्ह्यांतून ऊस मिळवला. त्यामुळे तोडणी व वाहतूक खर्च ७०० ते ८०० रुपयांवर गेले. त्याचाही भुर्दंड आता शेतकऱ्यांना कमी दराच्या रूपात बसला आहे.

यावर्षी श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचा एफआरपी (२ हजार ६६१) सर्वाधिक ठरला आहे. त्या खालोखाल तनपुरे (२ हजार ५७५) व अंबालिका (२ हजार ५१३) कारखान्यांचा दर निघाला आहे. वृद्धेश्वर व युटेकचे दर २ हजार रुपयांखाली आहेत.

असा ठरतो ऊस दर

केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ८५० रुपये दर जाहीर केला आहे. त्यापुढील प्रत्येक टक्क्यावर २८६ रुपये दर मिळतो. मात्र, त्यातून ऊसतोडणी व वाहतूक खर्च वजा केला जातो.

का घटला उतारा

मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे कारखान्यांनी राज्यभरातून मिळेल तसा ऊस उपलब्ध केला. त्यामुळे कुठूनही गुणवत्तापूर्ण ऊस मिळाला नाही. कार्यक्षेत्रातसुद्धा उसाला पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे साखर उतारा घटला.

कारखाने व त्यांचा एफआरपी -

अगस्ती : २,४५५, अशोक : २,१८८, ज्ञानेश्वर : २,०७४, कुकडी : २,४९५, प्रसाद शुगर : २,०९५, प्रवरा : २,२१९, गणेश : २,२२९, नागवडे : २,६६१, तनपुरे : २,५७५, कोपरगाव : २,३५५, संगमनेर : २,२४५, संजीवनी : २,०४५, केदारेश्वर : २,०५७, साईजन : २,३०५, गंगामाई : २,०३६.

एफआरपी अंतिम दर नाही

एफआरपी हा उसाचा अंतिम दर नाही. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थांच्या एकूण उत्पन्नातील ७५ टक्के पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात. तोच अंतिम भाव ठरतो.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी