शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनावर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळ पिकांना मागणी वाढली आहे. जीवनसत्व आणि प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या गुणधर्मामुळे लिंबू, संत्री ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळ पिकांना मागणी वाढली आहे. जीवनसत्व आणि प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या गुणधर्मामुळे लिंबू, संत्री आणि मोसंबी या फळांचा दररोजच्या आहारात आता समावेश झाला आहे. त्यामुळे या फळांचे दर भडकले आहेत.

साधारणपणे मोसंबी या फळाची औरंगाबाद, तसेच जालना जिल्ह्यातून बाजारात आवक होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दक्षिण नगर जिल्ह्यातील पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातही मोसंबीचे क्षेत्र वाढले आहे. संत्र्याच्या बागाही आता नगर जिल्ह्यात बहरल्या आहेत. विशेषत: ही नगर तालुक्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. श्रीगोंद्याने तर लिंबू उत्पादनाचे राज्यातील आगार म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या तीनही फळांची आवक चांगली आहे. मात्र, सध्या बाजारात मोसंबी व संत्रीचा पुरवठा होत नाही. लिंबू मात्र मुबलक आहे.

कोरोनाच्या रुग्णांना डॉक्टरांकडून सी जीवनसत्वाची औषधे दिली जातात. मात्र, लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिकदृष्ट्या हे घटक समाविष्ट आहेत. उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे या फळांचे ज्यूस आरोग्यदायी ठरते.

----

पंजाबचा किन्नू बाजारात

जानेवारी महिन्याच्या अखेरीस बाजारातून नागपूरच्या संत्र्याचा पुरवठा बंद होतो. त्यानंतर, पंजाब किन्नू या संत्रा फळाचे आगमन होते. मात्र, त्याला नागपुरी संत्र्याला गोडी नाही. मात्र, तरीही गुणधर्मामुळे नागरिकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते.

----

श्रीरामपूर परिसर हा पूर्वी मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता ही ओळख पुसली गेली आहे. कोरोनासारख्या साथ रोगांपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा मोसंबीसारख्या लिंबूवर्गीय फळांची लागवड करावी. कारण हवामान त्यासाठी अनुकूल आहे.

- सचिन मगर, वरिष्ठ संशोधक सहायक, लिंबू मोसंबी संशोधन केंद्र, श्रीरामपूर

------

आहारामध्ये दररोज लिंबूवर्गीय फळे व विशेषतः आवळ्याचा समावेश करायला हवा. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्त्व आहे. कुठल्याही स्वरूपातील आवळ्याचे सेवन केल्यास ताप व पचनाचा त्रास दूर होतो. कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

डॉ.महेश क्षीरसागर आयुर्वेद चिकित्सक, श्रीरामपूर

------

लिंबाचे दर

जानेवारी-फेब्रुवारी : ३० ते ३५ रु.

मार्च-एप्रिल : ७० ते ८० रु. (किलो)

मोसंबी

जानेवारी-फेब्रुवारी : २० ते ३० रु.

मार्च-एप्रिल : ५० ते ७० रु.

संत्रा : आवक नाही