शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

निळवंडे कालव्यांची कामे बंद पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:20 AM

अकोले : निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी नेण्याची शासनाला घाई झालेली आहे. परंतु, कालवाबाधितांचे व निळवंडे धरणग्रस्तांचे ...

अकोले : निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी नेण्याची शासनाला घाई झालेली आहे. परंतु, कालवाबाधितांचे व निळवंडे धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. धरणग्रस्त व कालवाबधितांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करून कालव्याची कामे पुढे रेटली तर प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत काँग्रेसचे मीनानाथ पांडे व पाटीलबुवा सावंत यांनी महाआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दौरा व अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. परंतु, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. अद्यापही घरांचा व पिकांचा मोबदला दिलेला नाही. अजूनही काही जमिनींचे भूसंपादन बाकी आहे. भूसंपादनाचे पैसे तालुक्यात येऊन ते वाटण्याचे महसूल विभागाने मान्य केले होते. कालव्यामध्ये संपादित जमिनीच्या झालेल्या चुकांच्या दुरुस्त्या करून सातबारा दुरुस्त करण्याचेही मान्य केले होते. यापैकी काहीही झाले नाही. तसेच जलसंपदा खात्याकडेही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मंत्रालय पातळीवर यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कालव्यांची कामे बंद पाडू, असा इशाराच दिला आहे.