शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

अंतरंगात दयेचा दिवा पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:25 IST

दया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.

सन्मतीवाणीदया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.दया माणसाच्या स्वभावात परिवर्तन घडविते. दया हृदय परिवर्तन देखील करु शकते. जीवन सुखद करण्यासाठी दया आवश्यक आहे. ज्यांच्या हृदयात सरलता आहे. तेथेच धर्माचे वास्तव्य असते. पाणी हे प्रवाही असते. पाण्यात कोणताही पदार्थ सामावून घेण्याची शक्ती असते. दयाळू माणसाच्या हृदयात धर्म वास करतो.धर्मामुळे असत्य दूर होते. स्वभाव बदलतो, प्रत्येक माणसाने भूतदया दाखविण्याची आवश्यकता आहे. भूतदया दाखविणे हाच खरा धर्म मानला जातो. सर्व प्राणीमात्रांवर समान प्रेम करण्यातच आपले हित आहे. ज्याच्या हृदयात दयाच नाही तो दुर्जन समजावा असे संत तुकाराम महाराज म्हणतात. पित्याने आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करावे. ज्या ठिकाणी मर्यादा आहे तेथेच धर्माचे अस्तित्व असते. ज्या ठिकाणी अधर्म असतो तेथे सुख, शांती नसते. परिवारात प्रेम, स्नेह जपला पाहिजे. तपसाधनेमुळेच मानसिक स्वास्थ्य ठीक राहते. आईचे मुलांबद्दलचे वात्सल्य अमोल असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. जोपर्यंत अंतरंगात दयेचा दिवा प्रकट होत नाही तोपर्यंत जीवनाला जीवन म्हणता येणार नाही. दया नसेल तेथे अधर्म असतो. तो दूर करण्यासाठी अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची आवश्यकता आहे.-प.पू.सन्मती महाराज.

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर