शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

दावणीला गायी नसताना कर्ज वाटप; अहमदनगर जिल्हा बँकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:49 AM

दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हरकत नोंदवली आहे.

अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना खेळते भांडवल द्या या सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत जिल्हा सहकारी बॅँकेने गायी नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जवाटप केले असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक उदय शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हरकत नोंदवली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा, औषधे यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी दोन गायींसाठी एकरी तीस हजार रुपये कर्ज देणारी ही योजना आहे. पाच एकर शेतीपर्यंत हे कर्ज मिळते. म्हणजे पाच एकर शेती व दहा गायी असणाऱ्या शेतकऱ्याला दीड लाख रुपये कर्जरूपात मिळू शकतात. या कर्जास सात टक्के व्याजदर असून, नियमित कर्ज भरल्यास यातील तीन टक्के व्याज केंद्र सरकार देणार आहे. थोडक्यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यास केवळ चार टक्केच व्याज पडणार आहे.

मात्र, जिल्हा बँकेमार्फत राबविल्या जात असलेल्या या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे गायी नाहीत त्यांनाही कर्ज दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बँकेचे संचालक उदय शेळके यांच्याकडे अशा तक्रारी आल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क करून या प्रकाराची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

१४४ कोटींचे वाटप

जिल्हा बँकेने या योजनेत आतापर्यंत २९ हजार शेतकऱ्यांना १४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक एस.जी. वर्पे यांनी ‘लोकमत’ला दिली. गायी नसताना कर्ज वाटप झाले असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क साधला असता नियमबाह्य कर्ज वाटप झाले असेल, तर चौकशी करू, असे तेही म्हणाले.

कर्ज वाटपाचे फोटो सेशन

शेतकऱ्यांना कर्ज देताना मोठे कार्यक्रम घेण्याचा धडाका काही संचालकांनी लावला आहे. कर्ज हे अनुदान नसून, ते शेतकऱ्यांना पुन्हा भरावे लागणार आहे. असे असतानाही या कर्ज वाटपाचे फोटो सेशन करून काही संचालक राजकीय फायदा उचलत आहेत. या कर्ज वितरणावरून बँकेत तीव्र मतभेद दिसत आहेत. प्रशासन काही संचालकांच्या दबावातून नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

गायी नसताना कर्ज वाटप केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. असे असेल तर हे नियमबाह्य कर्ज ठरेल. यामुळे खरे गरजवंत शेतकरी वंचित तर राहतीलच; पण हे कर्ज बुडाल्यास त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या ठेवींवर होईल. त्यामुळे या सर्व कर्जवाटपाची चौकशी व्हावी ही आपली भूमिका असून, यासंदर्भात आपण सोमवारी बँकेला लेखी पत्र देणार आहोत.

-उदय शेळके, संचालक, जिल्हा सहकारी बँक

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रAgriculture Sectorशेती क्षेत्र