शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी : जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लोणी (ता.राहाता), घोडेगाव (ता.नेवासा), कोपरगाव, आळेफाटा(पुणे) येथील जनावरांचे आठवडे बाजार दुधाळ गायीसाठी आणि गाभण गायीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब राज्यातून हजारो जनावरे येथे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. यामध्ये लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे सर्वंकाही ठप्प झाले आहे. हे आठवडा बाजार तीन-चार महिन्यांपासून बंद आहेत.

या जनावरांच्या बाजारात बैल, गाई, म्हशी, शेळी, मेंढी आदींची खरेदी-विक्री होत असते. स्थानिक परिसरातील तसेच परराज्यातून आलेले व्यापारी हे व्यवहार करून घेतात त्यातून त्यांना कमिशन मिळते त्यांचाही उदरनिर्वाह या जनावरांच्या बाजार व्यवहारातून चालतो पण हे बाजार बंद झाल्याने तेही व्यापारी आता अडचणीत सापडले आहेत.

सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. काही भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आपली जनावरे विकायची आहेत पण बाजार बंद आहे. त्यामुळे ती विकायची कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोना महामारी संकटामुळे गतवर्षीपासून शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. दुधाचा विक्रीचाही प्रश्न निर्माण होत आहे. खाद्य व दुधाचा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.

................

जनावरांना मिळेना किंमत

हा व्यवसाय बंद करावा, असे अनेकांना वाटत आहे पण गाई-म्हशी विकायच्या म्हटलं तर बाजार बंदमुळे त्यांना योग्य किंमत येत नाही. त्यामुळे सहन होईना अन्‌ सांगता येईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. सध्या गाय आणि म्हशीच्या दुधाला योग्य दर मिळत नाही, खाद्य व दर यांचा मेळ बसत नाही. त्यातच लॉकडाऊनच्या नावाखाली खाद्याचे दर वाढलेले आहेत. दुधाचे दर कमी झाल्याचे या सगळ्या परिस्थितीत व्यवसाय करणे अवघड झाले. परिणामी जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे.

-किरण घोगरे, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, लोणी,ता.राहाता

.................

लोणी (ता.राहाता) येथे जनावरांचा बाजार भरतो तो राज्यभर आणि राज्याबाहेर प्रसिद्ध आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बाजाराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते पण सध्या कोरोना महामारी संकटामुळे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. गतवर्षी कोरोनामुळे अनेक महिने बाजार बंद होता त्याचाही फटका बसला आहे.

-उद्धव देवकर,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता.

............................

बैलजोडीची खरेदी-विक्री बंद आहे

काही भागात अजूनही पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने शेतीची मशागत करून शेती केली जाते; मात्र सध्या सर्वच जनावरांच्या बाजाराला ब्रेक लागलेला आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर आला असून शेती मशागतीची लगबग वाढली आहे. शेती करण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांना चांगली बैलजोडी मिळविण्यासाठी शोध घ्यावा लागत आहे.