शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

लोकमत संवाद/ शहराच्या पर्यटनाचा अजेंडा ठरवावा लागेल - जयंत येलूलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 9:21 PM

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

अहमदनगर :  अहमदनगर हे पर्यटनस्थळ कसे करता येईल याचे साधे उदाहरण सांगतो. फराहबक्ष महाल एकेकोळी तळ््यात होता. तेथे पाण्याचा स्त्रोत भरपूर आहे. तेथे तलाव झाला तर नौकानयनाची सुविधा होईल. जेणेकरुन लोक तेथे फिरण्यासाठी जातील, अशी अपेक्षा रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.ते म्हणाले,  शहराच्या एका वर्धापनदिनी आम्ही भिस्तबाग महालावर विद्युत रोषणाई केली होती. त्यावेळी ही वास्तू इतकी अप्रतिम दिसत होती की ते चित्र पाहून नगरकर आचंबित झाले. सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आपण असे जतन केले व कल्पकता वापरुन त्यांचा विकास केला तर पर्यटक नगरला गर्दी करतील. भुईकोट किल्ला पाहण्यासाठी दूरवरून लोक येऊ शकतात. तेथे वीज, पाणी यांचा वापर करुन रात्री काही सांस्कृतिक ‘शो’ सुरु करता येऊ शकतो. या किल्ल्याभोवती मोठे खंदक आहेत त्याचाही अप्रतिम वापर करुन घेता येईल. पर्यटनस्थळे विकसित झाली की आपोआप छोटे-मोठे व्यवसाय, हॉटेल, रिक्षा, ट्रॅव्हल एजन्सी यांना रोजगार मिळेल. आपण गावातील रस्ते चांगले केले व पर्यटनस्थळे विकसित केली तरी शहर कितीतरी बदलेल. हे काम फार अवडघ नव्हे. केवळ इच्छाशक्ती हवी आहे. या वर्षभराचा अजेंडा ठरविण्यासाठी ‘लोकमत’ने खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. भाराभर अपेक्षा नोंदवून उपयोग नाही. माझ्या मते पर्यटनाचा आराखडा आपण निर्माण केला व वाडिया पार्कचा गुंता सोडविला तरी दोन मोठे प्रश्न मार्गी लागतील. नगरची पर्यटन स्थळे विकसित केल्यास शिर्डी, शिंगणापूरला जाणारे पर्यटक नगरमध्ये थांबतील. त्यातून अर्थचक्र फिरु शकेल, असेही ते म्हणाले.    अहमदनगर शहराच्या विकासाबाबत आजवर चर्चाच खूप झाली. आता ठोस कृती कार्यक्रम हवा आहे. या वर्षात  किमान नगरच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारने कृती आराखडा ठरविला तरीही विकासाच्यादृष्टीने मोठे पाउल पडेल. हे वर्ष पर्यटनस्थळांच्या विकासाभोवती केंद्रित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.