शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च मागे

By अरुण वाघमोडे | Updated: October 4, 2023 19:26 IST

अहमदनगर : मंत्रालयात १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक निश्चित केल्याचे पत्र दिल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते ...

अहमदनगर : मंत्रालयात १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक निश्चित केल्याचे पत्र दिल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते मंत्रालयापर्यंत काढण्यात आलेला लाँगमार्च मागे घेतला. बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार संग्राम जगताप यांनी भाळवणी येथे आंदोलकांशी चर्चा करत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचा तपशील सांगितला. त्यानंतर हा लाँग मार्च स्थगित करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी सांगितले.

सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबरपासून नगर ते मुंबई लाँगमार्च सुरू केला होता. भाळवणीपर्यंत हा लाँगमार्च पोहोचला होता. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता मनपाचे कामकाज ठप्प झाले होते. मंगळवारी आ. संग्राम जगताप यांनी तातडीने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनपा कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली.

त्यानुसार पवार यांनी १० ऑक्टोबर रोजी मंत्रालयात (मुंबई) वित्त व नियोजन विभागात सकाळी साडेदहा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारस लागू करणे, लाड, सफाई कामगार वारसा हक्काने सेवेत सामावून घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर