शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

संगमनेर-शिर्डीत जनताच न्यायाधीश: बाळासाहेब थोरात; विखे परिवाराची दहशत संपवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2024 08:49 IST

पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर/कोल्हार: विधानसभा निवडणुकीत शिर्डी आणि संगमनेर हे दोन्ही मतदारसंघ महाराष्ट्राचे केंद्रबिंदू बनले आहेत. संगमनेर तालुक्यात दहशत असल्याचा, विकास न झाल्याचा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीत संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत आता जनताच न्यायाधीश होईल. या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांची जनतेने तुलना करावी. दहशत नेमकी कोणत्या तालुक्यात आहे, याचाही फैसला करावा, असे आवाहन काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

शिर्डी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे यांनी सोमवारी (दि. २८) काँग्रेस पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी लोणी खुर्द येथे विजय संकल्प मेळावा झाला. यावेळी आमदार थोरात बोलत होते. व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार नीलेश लंके, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राजेंद्र बावके, नारायण कार्ले, विजय दंडवते, विक्रांत दंडवते, सचिन चौगुले, लता डांगे, शीतल लहारे, सुधीर म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रशांत शेळके, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र फाळके, सुरेंद्र खर्ड आदी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता आमदार थोरात म्हणाले की, त्यांना दोनदा जिल्हा परिषदेच्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी दिली. मात्र, ते विसरून गेले. संगमनेर तालुक्यात दहशतीचे एक तरी उदाहरण दाखवा, निळवंडे धरणाचे पाणी मी आणले. तुम्ही फक्त सोडण्याचे काम केले. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना निळवंडे धरणाचे पाणी सोडायलाही तुम्ही नेले नाही. निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज तुम्हीच केला. पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांनी ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला.

मी कनोली-मनोलीतच नव्हे, राज्यभर फिरतो : थोरात 

त्यांच्यासारखे माझे कनोली, मनोली, कनकापूर, दाड, चणेगाव, हसनापूर असे नाही. मला राज्यभर फिरावे लागते, असा टोलाही आमदार थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.

जया रडली नाही तर लढली 

धांदरफळ येथील सभेचा थोरात यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, टायगर अभी जिंदा है, असे तुम्ही सांगतात. तुम्ही मर्द होते तर कार्यकर्त्यांना मागे सोडून पळाले कशाला? अकोले, ठाणगाव समृद्धीमार्गे शिर्डीला पळाले. जयश्री थोरात या रडल्या नाही तर लढल्या. ती स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातील आहे. जे तुम्ही पाहिले ती झलक आहे. संगमनेर तालुका हा विचारांचा, चळवळीचा तालुका आहे. या तालुक्याच्या नादाला लागू नका, असा थेट इशाराही आमदार थोरात यांनी दिला.

देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा

वसंत देशमुख हे काँग्रेसचे आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना सांगितले. त्यावर थोरात आपल्या भाषणात म्हणाले, भाषण करताना देशमुख यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा होता. त्याहीपेक्षा त्यांच्या गळ्यात विखेंचा पट्टा आहे. भाजप हे त्यांच्यासाठी दुय्यम आहे. जिकडे विस्खे, तिकडे देशमुख, असाच त्यांचा आयुष्यभर कार्यक्रम राहिला आहे.

प्रभावती घोगरे प्रवरेची वाघीण: लंके

प्रभावती घोगरे या प्रवरेची वाघीण असून त्या विधिमंडळात जाणार आहेत. दहशत फार काळ टिकत नाही. अती तेथे माती होते. गणेश सहकारी साखर कारखान्यापासून हीच दहशत मोडून काढायला सुरुवात झाली. नगर दक्षिण मतदारसंघातील दहशत मोडीत काढली. जगन्नाथाचा रथ आता पुन्हा शिर्डी विधानसभा मतदारसंघात आला आहे. आम्ही हात जोडतो. वेळ आली तर बाह्यादेखील वर करतो, असा इशारा खासदार लंके यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsangamner-acसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील