शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

दुष्काळी संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत बनला: सत्यजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2024 09:24 IST

घुलेवाडी, राजापूर येथील नागरिकांशी संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : सुमारे ४० वर्षांपूर्वी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

आमदार तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, राजापूर येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, पंचायत समितीचे माजी सभापती नवनाथ अरगडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, अनेक लाटा आल्या आणि गेल्या. मात्र, संगमनेर तालुक्यातील जनता आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी उभी आहे. संगमनेर तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्यावेळी आमदार थोरात हे जनतेच्या मदतीला उभे राहिले. मग ते कोरोनाचे संकट असो अथवा पूर परिस्थिती असेल, अशा सगळ्याच परिस्थितीमध्ये आमदार थोरात कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावत होते, संपूर्ण संगमनेर तालुक्याला आमदार थोरात यांनी विकासातून वैभवाकडे नेले. १७१ गावे, २५८ वाड्यावस्त्या असलेला संगमनेर तालुका ११० किलोमीटर लांबीचा असून येथे सातत्याने विकासकामे सुरू असतात. सहकार, शिक्षण, शेती, ग्रामीण विकास यामाध्यमातून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे, असे तांबे म्हणाले.

बाह्य शक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला 

बाह्य शक्त्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु खालच्या पातळीवर जेव्हा टीका झाली, तेव्हा संगमनेर तालुक्यातील नागरिक एकवटले आणि तालुक्याची अस्मिता जागी झाली. विधानसभा निवडणुकीतून संगमनेर तालुक्यातून विक्रमी मताधिक्याचे मापदंड निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. बाह्यशक्त्तीसह अनेकांनी तालुक्याच्या अस्मितेला डिवचण्याचा जेव्हा प्रयत्न केला. तेव्हा तालुका एकवटला आहे, असेही आमदार तांबे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAhilyanagarअहिल्यानगरsangamner-acसंगमनेरSatyajit Tambeसत्यजित तांबे