शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

विकासासाठी महायुतीचे सरकार गरजेचे: पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2024 13:06 IST

चिचोंडी येथे शिवाजी कर्डिले यांच्यासाठी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळ चिचोंडी : केंद्रात भाजप मित्र पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यातही महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत 'फेक नॅरेटिव्ह' तयार केले गेले; मात्र आता राज्याचा विकास साधण्यासाठी 'फेक नॅरेटिव्ह'ला बळी न पडता महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मागे उभे राहा, असे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी शुक्रवारी दुपारी प्रचारसभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील, मतदारसंघाचे प्रभारी महेंद्रभाई पटेल, आमदार मोनिका राजळे, विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिंदेसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सत्यजित कदम, अक्षय कर्डिले, राजूभाऊ शेटे, धनराज गाडे, सुरेश बानकर, बाबा राजगुरू, सीमाताई ठोंबरे, नामदेवराव ढोकणे, विक्रमराव तांबे, भाऊसाहेब बर्फ, डॉ. मृत्युंजय गर्ने, बाबा राजगुरू, विलास गजभिव, काशीनाथ पाटील लवांडे, अहिल्यानगर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, बाळासाहेब अकोलकर, संभाजी पालवे, पुरुषोत्तम आठरे, शिवाजीराव पालवे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, शिवाजी कर्डिले हे कामाचा माणूस आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी कधी वयाचाही विचार केला नाही. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले. मुंडे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव विकासकामे झाली; परंतु लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून 'फेक नॅरेटिव्ह' तयार केले गेले. त्याचेच मी आणि डॉ. सुजय विखे आम्ही बळी ठरलो. सुजय विखे यांनी मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी आणला; परंतु 'फेक नॅरेटिव्ह'ने एका चांगल्या कर्तृत्ववान नेतृत्वाला घरी बसविले.

आमदार नसूनही विकासकामे केली... 

शिवाजी कर्डिले म्हणाले, आमदार, मंत्री असतानाही मागील पाच वर्षात त्यांना विकासकामे करता आली नाहीत. आता महायुती सरकारने निधी देताना भेदभाव केल्याचा आरोप निष्क्रियता झाकण्यासाठी विरोधक करत आहेत. मी आमदार नसतानाही पाच वर्षे मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहिलो.

२३ नोव्हेंबरलाच बोलू... 

माजी खासदार डॉ. सुजय विखे- पाटील म्हणाले, उगाच एखाद्या व्यक्तीवर बोलून त्याचे महत्त्व वाढविण्याची गरज नाही. आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे २३ नोव्हेंबरला कामातूनच बोलू. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAhilyanagarअहिल्यानगरrahuri-acराहुरीPankaja Mundeपंकजा मुंडे