शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

सर्वाधिक सात जागा शरद पवार गटाकडे; २०१९ मध्ये कोणी किती जागा लढविल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2024 11:01 IST

याहीवेळी काँग्रेसने तीन जागांवरच उमेदवार दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा लढविल्या होत्या. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने सात, तर भाजपने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. परंतु श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेनेही उमेदवार दिला आहे.

मागील विधानसभा निवडणूक आघाडी व युतीने एकत्र लढविली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा लढविल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जिल्ह्यातील सात जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने गतवेळी तीन जागा लढविल्या होत्या. याहीवेळी काँग्रेसने तीन जागांवरच उमेदवार दिले आहेत.

शिवसेनेने गतवेळी चार जागा लढविल्या होत्या. शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. उद्धवसेना महाविकास आघाडीसोबत आहे. उद्धवसेनेला यावेळी दोन जागा मिळाल्या आहेत. गतवेळी भाजपने आठ जागा लढविल्या होत्या. यंदा भाजपच्या वाट्याला पाचच जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. शिंदेसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात २८८ इच्छुकांनी ४१५ अर्ज दाखल केले असून सर्वाधिक ३६ जणांनी ५४ अर्ज श्रीगोंदा मतदारसंघातून दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मागील सात दिवस इच्छुकांकडून उमेदवारी अर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरु होती. अखेर मंगळवारी दुपारी ३ वाजता ही धावपळ शांत झाली. शेवटच्या दिवशी जिल्ह्यातून १७० जणांनी २४१ अर्ज दाखल केले.

जिल्ह्यात एकूण २८८ उमेदवारांनी ४१५ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अकोले मतदारसंघात १३ जणांनी १६ अर्ज दाखल केले तर संगमनेरात १६ इच्छुकांनी २४ अर्ज, शिर्डीतून १५ जणांनी २५ अर्ज, कोपरगावमधून १९ इच्छुकांनी ३० अर्ज, श्रीरामपूर मतदारसंघात ३१ जणांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत. नेवासामधून २० जणांनी ३३ अर्ज, शेवगावमधून ३६ इच्छुकांनी ४७ अर्ज, राहुरीत २७ जणांनी ३८ अर्ज, पारनेरमधून २१ इच्छुकांनी २३ अर्ज, नगर शहरातून २७ जणांनी ३७ अर्ज, श्रीगोंदा मतदारसंघातून ३६ जणांनी ५४ अर्ज तर कर्जत-जामखेडमधून २३ इच्छुकांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत.

२०१९ मध्ये कोणी किती जागा लढविल्या? 

राष्ट्रवादी काँग्रेस- अहमदनगर शहर, कोपरगाव, राहुरी, अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत- जामखेड, काँग्रेस- संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी शिवसेना- अहमदनगर शहर, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर भाजप- शिर्डी, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, अकोले 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAhilyanagarअहिल्यानगर